मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे, 1 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही उभी फूट पडली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली30 आमदार सरकारला पाठिंबा देणार आहेत, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा देखील अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा आहे. आज सायंकाळी अजित पवार यांच्या सह 9 जण सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेणार आहेत, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहे, विशेष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये अजित पवार निधी देताना अन्याय करत होते असा आरोप करून सत्तेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे आमदार आता पुन्हा अजित दादा पवार यांच्यासोबत सत्तेत एकत्र आले आहेत, गेल्या अडीच वर्षात चौथ्यांदा राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत, पहाटेच्या शपथ विधी नंतर महाविकास आघाडी चा त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि आता पुन्हा राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट असा एकत्रित मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…