उत्तर महाराष्ट्र

कुळवंडी बंधार्‍याने 10 गावांचा दुष्काळ संपणार

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : पेठ तालुक्यातील कुळवंडी येथे बंधारा बांधण्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणाचा दहा गावांना फायदा होणार असून, तालुक्याची सिंचन क्षमता 230 हेक्टरने वाढणार आहे. या प्रकल्पामुळे कुळवंडी शिवारातील गावांचा 20 वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार असल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

बंधार्‍याच्या कामाचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी नारायाण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, सचिन खंबाईत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला हरिभाऊ गिते यांची मदत होणार आहे. त्यांना कामाची पध्दत माहिती असल्याने  प्रत्येक टेबलविषयी त्यांना इंथभूत माहिती आहे. त्यामुळे तत्वाला काम मार्गी लागते. त्यांच्याकडे एक काम दिले होते. त्यांनी आठ दिवसांत ते काम मार्गी लावले. त्यांच्यासारखा अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुळवंडीचा या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह कृषी सिंचनासअठी जवळपास 69.26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे कुळवंडीसह घनशेतपाडा, हट्टीपाडा, नाईकपाडा, निमोणीपाडा, कडवईपाडा, बर्डापादा व गावंद येथील गावांना पाणी मिळेल. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. आमदार नरहरी झिरवाळ हेच मतदारसंघाचे पाणदेव असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नगराध्यक्ष करण करवंदे, मनोहर चौधरी, गोकुळ झिरवाळ, गिरीश गावित, रामदास गवळी, हिरामण पवार, मोहन गावंडे, हनुमंत गवळी, गणेश गवळी आदी उपस्थित होते.

 

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये

पाणलोट क्षेत्र : 4.95 चौरस किलो मिटर

साठवण क्षमता : 69.26 दशलक्ष घनफूट

सिंचन क्षमता : 230 हेक्टर

धरणाची उंची : 29.24 मीटर

धरणाची लांबी : 375 मीटर

सांडव्याची रुंदी : 56 मीटर

कालवा लांबी : 2 किलो मिटर

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago