नाशिक

विंचूर उपबाजार आवारात कांद्याला मिळाला ५० पैसे किलो दर

 

लासलगाव :समीर पठाण

विंचूर उपबाजार कांदा आवारात गुरुवार दि १९ रोजी झालेल्या कांदा लिलावात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे नाराज झालेल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले

या बाबत मिळालेल्या माहितनुसार येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सुशील दुघड यांनी त्यांचा गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता.लिलावात या कांद्याला २०० रुपयांची बोली लावण्यात आली परंतु कांद्याची प्रतवारी तुलनेत थोडी कमी असल्याने लिलावात शिव भोले या कंपनीने या कांद्याला ५१ रुपये प्रति क्विंटल बोली लावल्यामुळे नाराज झालेल्या या शेतकऱ्याने हा कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले.तर बाजार समिती प्रशासनाने याबाबत सांगितले की लिलावास आलेला कांदा हा खूपच कमी गुणवत्ता असलेला असून खाण्या योग्य व प्रतवारी केलेला नसल्याने या कांद्याला जाहीर लिलावात कमी दर मिळाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.त्यात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

मी २० क्विंटल गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता परंतु माझ्या कांद्याची प्रतवारी योग्य नसल्याचे कारण देत माझ्या कांद्याला ५१ रु प्रती क्विंटल बाजारभाव मिळाला असल्यामुळे मी हा कांदा घरी नेणे पसंद केले.गेल्या चार दिवसापासून दोन मजूर लावत कांद्याची प्रतवारी केली आणि बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणला मात्र एवढा खर्च होऊनही कांद्याला पाच पैसे प्रति किलो असा दर मिळाल्याने शेतात पिकवायचे तरी काय.केंद्र सरकारने शेतकऱ्याना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी उद्रेक करेल व तो कोणाला परवडणारा नसेल.

सुशील दुघड कांदा उत्पादक शेतकरी
देशमाने

बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन—

सद्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीस मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.उष्णतेमुळे कांद्याची प्रत ही खराब होत आहे.साठवणूक झाल्यानंतर उर्वरित कांदा शेतकरी लिलावासाठी बाजार समितीत आणत आहे.उष्णतेमुळे या कांद्याची प्रत घसरली असल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही.शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago