नाशिक

कोरोनाची दक्षता, दहा हजार किटची मागणी; मनपाकडून खबरदारी

नाशिक : प्रतिनिधी
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नाशिक महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने आरोग्य उपसंचालकांकडे दहा हजार अँटिजन टेस्ट किटची मागणी केली आहे. तसेच आवश्यक वाटल्यास खासगी कंपनीकडून किट खरेदी केली जाणार आहेत. बिटको व डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात वीस खाटांची सोय पालिका प्रशासनाने केली आहे.
कोरोनाच्या लक्षणात बदल होत असल्याने खबरदारीच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. लोकांची गर्दी, योग्य स्वच्छतेचा अभाव, आणि मास्कचा वापर न करणे या सवयींमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. सर्दी, खोकला, ताप, दम लागणे किंवा गंध व चव जाणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरात विलगीकरण करा आणि इतरांच्या संपर्कात जाणे टाळा. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर दीर्घकालीन आजार आहेत त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करा.
कोरोनामुळे आलेल्या तणावाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ध्यान, योग आणि सकारात्मक विचार यांचा सराव करा. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबई येथे आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर आता महापालिकाही अलर्ट झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनाने शहरात हाहाकार माजवला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

आरोग्य उपसंचालकांकडे दहा हजार अँटिजन टेस्ट किटची मागणी करण्यात आली आहे.

खबरदारी म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.

शहरात अद्याप कोणीही संशयित रुग्ण नाही.

मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावयाची आहे.

-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago