नाशिक

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम

सन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात पक्षी वाचवा, घरटी वाचवा अभियान सुरू करण्यात आले असून, त्यातूनच 140 विद्यार्थ्यांनी चिऊताईसाठी वेगवेगळ्या आकाराची घरटी बनविली आहेत. याशिवाय, विद्यालयाच्या आवारात ही घरटी ठेवून तेथे दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भूतदयेचा विचार विद्यार्थ्यांच्या अंगी रुजला गेल्याने त्यांनी पक्षी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
निसर्गाची प्रथम ओळख मानवाला चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा सांगतच आपली आई आपणास एक एक घास भरवते. अंगणात, गॅलरीमध्ये दाणे टिपणारी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी होत चालली आहे. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. ही बाब हेरून शहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या दाबाचे तंत्र आणि धान्य फीडर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपापल्या कल्पनांनुसार सुंदर घरटी बनवली आहे. यासाठी पत्रा, पुठ्ठा, खोकी, प्लास्टिकचे डबे, पाचट, गवत, झाकण, पाइप आदींचा खुबीने वापर करण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने बनवलेल्या घरट्यावर स्वतःचे नाव टाकून ही घरटी विद्यार्थ्यांनी झाडे, शालेय परिसर, वरंड्यात लावली आहेत. विद्यार्थी दररोज पक्ष्यांना या घरट्यांमध्ये दाणापाण्याची सोय करत आहे. ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी, धान्य उपलब्ध होत नाही म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. घराच्या परिसरातही घरटे बनवून लावणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमास उपशिक्षिका बरखा साळी, भारती खंबाईत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे घरटे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्राचार्य नामदेव कानसकर, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे, आर. जे. थोरात, व्ही. व्ही. पाटील, पी. एस. बधान, क्रीडाशिक्षक एस. टी. गुरुळे, आर. पी. गवळी, अलका कोतवाल, बाळासाहेब कुमावत, नवनाथ पाटील, दत्तात्रय आदिक, गणेश मालपाणी, प्रा. सचिन रानडे, प्रा. रवींद्र डावरे, प्रा. अमोल व्यवहारे, वरिष्ठ लिपिक व्ही. के. ठोक, जगन शिंदे, सुनील तासकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा

पशुपक्षी हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. पक्ष्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी विद्यालयात एक विद्यार्थी-एक घरटे असा उपक्रम हाती घेतला आहे.
-नामदेव कानसकर, मुख्याध्यापक, भैरवनाथ हायस्कूल, शहा

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

11 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

11 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

11 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

11 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

11 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

12 hours ago