श्रीलंकेत उपासमार, भारताकडून तांदूळ

श्रीलंकेत उपासमार, गंभीर आर्थिक संकट
भारताकडून ४० हजार टन तांदळाची मदत

नवी दिल्ली:- आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत उपासमार सुरू झाली असून, भारताने या देशाला तातडीची मदत म्हणून 40 हजार टन तांदूळ पाठविला आहे.
भारताच्या शेजारील श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला असून, गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. विदेशी चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, हा देश इतर देशांच्या कर्जखाली दबला आहे. दिवाळखोरीच्या संकटातून बाहेर श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. त्यात भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. अन्न संकट
संपवण्यासाठी भारताने 40 हजार टन तांदूळ पाठवून दिलासा दिला आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली असून, लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
भीषण आर्थिक संकट आणि निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की, लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. पेट्रोलपेक्षाही दूध महाग झाले आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपये, तर मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये किलाे झाले आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.

Ramesh Shejwal

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago