श्रीलंकेत उपासमार, गंभीर आर्थिक संकट
भारताकडून ४० हजार टन तांदळाची मदत
नवी दिल्ली:- आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत उपासमार सुरू झाली असून, भारताने या देशाला तातडीची मदत म्हणून 40 हजार टन तांदूळ पाठविला आहे.
भारताच्या शेजारील श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला असून, गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. विदेशी चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, हा देश इतर देशांच्या कर्जखाली दबला आहे. दिवाळखोरीच्या संकटातून बाहेर श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. त्यात भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. अन्न संकट
संपवण्यासाठी भारताने 40 हजार टन तांदूळ पाठवून दिलासा दिला आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली असून, लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
भीषण आर्थिक संकट आणि निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की, लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. पेट्रोलपेक्षाही दूध महाग झाले आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपये, तर मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये किलाे झाले आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.
मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…
मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…
मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…
एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…
पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…
ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्यांना महापालिका निवडणुकीत…