श्रीलंकेत उपासमार, गंभीर आर्थिक संकट
भारताकडून ४० हजार टन तांदळाची मदत
नवी दिल्ली:- आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत उपासमार सुरू झाली असून, भारताने या देशाला तातडीची मदत म्हणून 40 हजार टन तांदूळ पाठविला आहे.
भारताच्या शेजारील श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला असून, गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. विदेशी चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, हा देश इतर देशांच्या कर्जखाली दबला आहे. दिवाळखोरीच्या संकटातून बाहेर श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. त्यात भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. अन्न संकट
संपवण्यासाठी भारताने 40 हजार टन तांदूळ पाठवून दिलासा दिला आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली असून, लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
भीषण आर्थिक संकट आणि निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की, लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. पेट्रोलपेक्षाही दूध महाग झाले आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपये, तर मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये किलाे झाले आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…