पाडळी देशमुख रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने पाडळी देशमुखसह १२ वाड्या व शालेय विद्यार्थ्यांना रस्ता बंद
■ रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात काल शनिवार दिनांक ३ पासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख गावाकडे जाणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाणी निघत नसल्याने पाडळी देशमुख गावचा व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांचा व मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले मात्र येथे येणाऱ्या पाण्याला निघण्यासाठी अगदी छोटी मोरी टाकल्याने बाहेरून येणारे पाणी निघत नाही परिणामी येथे पाण्याचा तुंब बसुन पुलाच्या दोनही बाजुपर्यंत पाणी पांगल्याने पायी जाणे तर सोडा वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत असुन अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला लाऊन दिले जात आहे. यामुळे पाडळी देशमुख गावकऱ्यांस व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या गावांतील शालेय विद्यार्थ्यांचा जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन रेल्वे प्रशासनाने येथील मोरी काढुन पाणी निघण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी इगतपुरी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, महेश धांडे, रतन धांडे, दिनेश धोंगडे, रामभाऊ धोंगडे, बाळासाहेब धांडे, नितीन धांडे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली .
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…