नाशिक

लासलगाव मार्गे अमेरिकेत ३६० मेट्रिक टन आंबे निर्यात.

२०१९ च्या तुलनेत ३२५ मे टन ने घट

लासलगाव : समीर पठाण

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही १२ एप्रिल पासून लासलगाव मार्गे सुरू झाली आहे.

या हंगामात ३६० मॅट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून न्यूयॉर्क,कॅलिफोर्निया,सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस,शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाली आहे.मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत झाली आहे.लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो,केशर,बदाम, राजापूर,मल्लिका,हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन ३६० मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली सन २०१९ च्या तुलनेत आंबा निर्यातीत ३२५ मे टन ने घट झाल्याचे दिसत आहे.यंदा ऑस्ट्रेलिया मध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे.

भारतामध्ये विविध प्रकारचे आंब्यांच्या जाती असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व इतर देशांना निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते. या निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तर यंदा लासलगाव मार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाले आहे.

किरणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणाना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरात मधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटक मधील बेंगलोर येथील केंद्रांचा समावेश आहे. प्रक्रिया करून आंबे विमानाने पाठवले जात आहे.यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रा मार्गे प्रथमच परदेशवारीही करण्यात यश आले आहे नाशिक येथील हेमंत सानप या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे त्यामुळे पुढील वर्षी आंबा निर्यातीत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

२००७ पासून अमेरिकेला झालेली भारतीय आंब्याची आवक

सन निर्यात (टन)

२००७ १५७

२००८ २७५

२००९ १२१

२०१० ९६

२०११ ८५

२०१२ २१०

२०१३ २८१

२०१४ २७५

२०१५ ३२८

२०१६ ५६०

२०१७ ६००

२०१८ ५८०

२०१९ ६८५

२०२० आणि २०२१ कोरोना प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही.

२०२२ -३६०

Ashvini Pande

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

9 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

9 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

9 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

9 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

9 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

9 hours ago