६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाशिक केंद्रातून ‘चांदणी’ प्रथम
मुंबई ;
६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून संवर्धन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नाशिक या संस्थेच्या चांदणी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाटयसेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेच्या इश्क का परछा या नाटकास द्वितीय आणि बॉश फाईन आर्टस, नाशिक या संस्थेच्या शीतयुध्द सदानंद या नाटकासाठी तृतीय पारितोषिक पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तीन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक रोहित पगारे (नाटक- चांदणी), द्वितीय पारितोषिक आनंद जाधव (नाटक-
इश्क का परछा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक रविंद्र रहाणे (नाटक- चांदणी), द्वितीय पारितोषिक कृतार्थ
कंसारा (नाटक- इश्क का परछा), नेपथ्य प्रथम पारितोषिक किरण भोईर (नाटक- शक्ती शिवाचा तेजोगोल),
द्वितीय पारितोषिक भूषण गायकवाड (नाटक चांदणी), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सुरेश भोईर (नाटक-शक्ती शिवाचा तेजोगोल), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक चांदणी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक दिलीप काळे (नाटक चांदणी) व अनुजा देवरे (नाटक चांदणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सई मोने पाटील
(नाटक- शीतयुध्द सदानंद), माधुरी पाटील (नाटक फायनल ड्राफ्ट), प्रतिक्षा बेलसरे (नाटक- खिडक्या).
रुपाली देशपांडे-नाईक (नाटक-ब्रेकिंग न्युज), केतकी प्रशांत पंचभाई (नाटक- प्रतिकार), आर्यन जाधव (नाटक-
इश्च, मनोज शेंद्रे (नाटक- उलगुलान), अमोल थोरात (नाटक- शिवाचा), धनंजय
गोसावी (नाटक- शीतयुद्ध सदानंद), संदीप पाचंगे (नाटक- पळा पळा कोण पळे तो).
दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री मंगेश नेहरे, किरणकुमार अडकमोल आणि विश्वास पांगारकर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…