नाशिक

जिल्ह्यात 69 हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकले

फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका

नाशिक : प्रतिनिधी
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. वेळोवेळी कृषी प्रशासनाकडून आवाहन करूनदेखील फार्म आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात 69 हजार 453 शेतकर्‍यांना पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
केंद्र शासनाने शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकर्‍यांना फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने वेळोवेळी फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहनदेखील केले जात आहे.
कृषी विभागाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तीन लाख 66 हजार 508 शेतकर्‍यांनी फार्मर आयडी काढले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख 32 हजार 961 शेतकरी पात्र ठरले आहेत. यांपैकी तीन लाख 66 हजार 508 शेतकर्‍यांनी फार्मर आयडी कार्ड काढले. उर्वरित 69 हजार 453 शेतकर्‍यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

अ‍ॅग्रीस्टिक पोर्टलवर नोंद

ज्या शेतकर्‍यांनी फार्मर आयडी काढले आहेत, त्यांची नोंद अ‍ॅग्रीस्टिक पोर्टलवर करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले; परंतु फार्मर आयडी न काढलेल्या शेतकर्‍यांना या योजनेसह अन्य लाभाच्या योजनेलादेखील आता मुकावे लागणार आहे.
आतापर्यंत 21 हप्ते वितरित
पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. महाराष्ट्र सरकारनेदेखील नमो शेतकरी महासन्मान निधी सुरू केल्याने शेतकर्‍यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळत आहेत. आजपर्यंत केंद्र सरकारकडून 21 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago