नाशिक

आयमात जीएसटीबाबतच्या चर्चासत्राचा 70 उद्योजक,व्यावसायिकांनी घेतला लाभ

रवींद्र देवधर,दीपक जोशी यांनी केले मार्गदर्शन
नाशिक: प्रतिनिधी

जीएसटीसंदर्भातील किचकट तरतुदी आणि उणिवा याबाबत आयमाच्या के.आर.बूब सभागृहात  आयोजित महत्वपूर्ण चर्चासत्रात विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांना सोप्या शब्दांत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
   व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,कर समिती चेअरमन नितेश नारायणन, को चेअरमन सुमीत बजाज,अरिफ खान मन्सुरी आदी होते. आयमा व दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकॉउंटस ऑफ इंडिया नाशिक-ओझर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
     प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ केले.उद्योजक आणि व्यावसायिकांना जीएसटीबाबत अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या अनेक किचकट तरतुदी असून त्याचे सर्वांना सखोल ज्ञान मिळावे व येणाऱ्या समस्यांना सुलभ रीत्या सामोरे जाता यावे यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे पांचाळ यांनी यावेळी सांगितले.
   विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी जीएसटीसंदर्भात असलेल्या उणिवा,त्याबाबतचे नियम,त्यात झालेले बदल त्यात करावयाची सुधारणा,नियमांचे स्पष्टीकरण, निर्णय,अपील,करांबाबतचे विवाद,जीएसटीकडून येणाऱ्या नोटिसांना कसे सामोरे जावे,आपला बचाव कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना या दोघांनीही समर्पक उत्तरे दिली.नोटिसा आल्यानंतर त्याने घाबरून जाऊ नका.नोटीस केव्हा पाठवली यापेक्षा ती तुम्हाला केव्हा मिळाली याला विशेष महत्व आहे.नोटीस देवनागरी भाषेत पाठवा अशी मागणीही तुम्ही करू शकता.नोटिसीला मुद्देसूद उत्तरे द्या.तुम्ही दिलेल्या उतारानंतर त्याची वैयक्तिक सुनावणी होणे गरजेचे असते.त्याशिवाय संबंधित ऑथर्टीला ऑर्डर पास करता येत नाही याची आठवणही देवधर आणि जोशी यांनी उपस्थितांना यावेळी करून दिली.आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.चर्चासत्रास  70हून अधिक उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा : आयमाच्या पुढाकाराने मंगळवारी रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत चर्चासत्र

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago