नाशिक

आयमात जीएसटीबाबतच्या चर्चासत्राचा 70 उद्योजक,व्यावसायिकांनी घेतला लाभ

रवींद्र देवधर,दीपक जोशी यांनी केले मार्गदर्शन
नाशिक: प्रतिनिधी

जीएसटीसंदर्भातील किचकट तरतुदी आणि उणिवा याबाबत आयमाच्या के.आर.बूब सभागृहात  आयोजित महत्वपूर्ण चर्चासत्रात विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांना सोप्या शब्दांत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
   व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,कर समिती चेअरमन नितेश नारायणन, को चेअरमन सुमीत बजाज,अरिफ खान मन्सुरी आदी होते. आयमा व दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकॉउंटस ऑफ इंडिया नाशिक-ओझर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
     प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ केले.उद्योजक आणि व्यावसायिकांना जीएसटीबाबत अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या अनेक किचकट तरतुदी असून त्याचे सर्वांना सखोल ज्ञान मिळावे व येणाऱ्या समस्यांना सुलभ रीत्या सामोरे जाता यावे यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे पांचाळ यांनी यावेळी सांगितले.
   विख्यात कर सल्लागार रवींद्र देवधर आणि दीपक जोशी यांनी जीएसटीसंदर्भात असलेल्या उणिवा,त्याबाबतचे नियम,त्यात झालेले बदल त्यात करावयाची सुधारणा,नियमांचे स्पष्टीकरण, निर्णय,अपील,करांबाबतचे विवाद,जीएसटीकडून येणाऱ्या नोटिसांना कसे सामोरे जावे,आपला बचाव कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना या दोघांनीही समर्पक उत्तरे दिली.नोटिसा आल्यानंतर त्याने घाबरून जाऊ नका.नोटीस केव्हा पाठवली यापेक्षा ती तुम्हाला केव्हा मिळाली याला विशेष महत्व आहे.नोटीस देवनागरी भाषेत पाठवा अशी मागणीही तुम्ही करू शकता.नोटिसीला मुद्देसूद उत्तरे द्या.तुम्ही दिलेल्या उतारानंतर त्याची वैयक्तिक सुनावणी होणे गरजेचे असते.त्याशिवाय संबंधित ऑथर्टीला ऑर्डर पास करता येत नाही याची आठवणही देवधर आणि जोशी यांनी उपस्थितांना यावेळी करून दिली.आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.चर्चासत्रास  70हून अधिक उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा : आयमाच्या पुढाकाराने मंगळवारी रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत चर्चासत्र

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago