रानमेव्याला अवकाळीचा तडाखा

इगतपुरी: निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणार्‍या गावठी रानमेव्याला वाईट दिवस आले आहेत. सध्याच्या वाईट परिस्थितीमुळे व वेळोवेळी येणार्‍या ढगाळ वातावरणामुळे गावरान आंबा, जांभूळ व करवंदांसह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाभरात आंब्याबाबत परिस्थिती सारखीच राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *