मनमाड जवळ बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी

मनमाड : आमिन शेख

मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील रामदास सिताराम आहेर या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असुन या घटनेमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये  आता धास्ती निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील शेतकरी रामदास सिताराम आहेर हे रात्री 9 वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटोपून घरी येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या वर हल्ला चढविला आणि यात त्यांच्या शरीराचे लचके तौडून त्यांना गंभीर जखमी केले बिबट्याने त्यानंतर धूम ठोकली आहे मात्र आता या भागात बिबटया मुक्त संचार करत असुन आता तो नरभक्षक झाला असल्याने या भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *