आरटीओ, वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
देवळाली कॅम्प : भैयासाहेब कटारे
शहरात खासगी वाहनांवर राजमुद्रा लावून फिरणार्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, वाहतूक पोलिस, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
विविध सरकारी कार्यालयांच्या परिसरात ही वाहने आढळून येतात. यात माजी तसेच विद्यमान आमदार, खासदारांच्या गाड्यांबरोबरच कार्यकर्त्यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. शहरातील अनेक आमदारांचे डावे-उजवे तसेच एकनिष्ठ कार्यकर्ते स्वत:च्या वाहनावर राजमुद्रेचे स्टिकर लावून पोलिसांसमोरच मुक्तपणे वावरताना दिसून येतात. या कार्यकर्त्यांना कुणीच याबद्दल जाब विचारताना दिसून येत नाही. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नियम काय सांगतो?
भारताचे राष्ट्रीय चिन्ह (राजमुद्रा) केवळ अधिकृत शासकीय वापरासाठीच आहे. शासकीय वाहनांवरच ते आदेशानुसार वापरता येते. खासगी वाहनांवर राजमुद्रा वापरणे एालश्रशाी रपव छराशी अलीं, 1950 चा भंग ठरतो. खासगी वापरासाठी (उदा. खासदार/आमदारांची वैयक्तिक गाडी किंवा व्यावसायिक वापर) राजमुद्रा वापरणे बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई होऊ शकते. खासदार, आमदार केवळ चशालशी ेष झरीश्रळराशपीं किंवा चङअ असे फलक लावू शकतात. मात्र, राजमुद्रा वापरणे निषिद्ध आहे.