पावसाळ्यात पायांना चिखल्या

पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना चिखल्या होऊ नयेत म्हणून पाच उपाय, चप्पल-बुटांची दुर्गंधी जाईल

पावसाळा सुरू झाला की, अनेकांना एक सामान्य, पण त्रासदायक समस्या जाणवते. सतत ओले होणारे पाय, चिखल, पावसाचे पाणी आणि घर्षण यामुळे चपला किंवा सँडल पायाला लागतात. परिणामी पायावर फोड येतात, त्वचा सोलली जाते आणि काही वेळा लहान जखमाही होतात. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटत असला, तरी दुर्लक्ष केल्यास वेदना वाढू शकतात आणि संसर्ग होण्याची शक्यतादेखील निर्माण होते.
पावसात भिजून आल्यानंतर पाय शक्य तितक्या लवकर स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. बाहेरून आल्यावर फक्त पाय पुसू नका. ते स्वच्छ पाण्याने धुवा. अनेकदा लोक ओल्या पायांनीच बराच वेळ राहतात. त्यामुळे त्वचा अधिक नाजूक होते आणि घर्षणामुळे जखम होण्याचा धोका वाढतो. पायाच्या बोटांमधील भागही व्यवस्थित कोरडा करणे गरजेचे आहे.
जर पायावर फोड येण्यास सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फोड फोडण्याचा प्रयत्न करू नये. तो भाग स्वच्छ ठेवावा आणि आवश्यक असल्यास बँडेज लावावे. जखम झाल्यास ती कोरडी आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लालसरपणा, सूज किंवा पू दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Fungal infections of the feet during the monsoon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *