तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला, पालखीचे प्रस्थान

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (दि. 7) पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ग्यानबा तुकारामांच्या जयघोषात पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला होता. पुढे इनामदार वाड्यात जाऊन पालखीचा मुक्काम असेल. त्यानंतर चांदीच्या रथातून पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत लागणारा भुसार साहित्याचा शिधा, भाजीपाला, मंडप साहित्य, राहुट्यांचे बांबू, तंबू, तंबूच्या काठ्या व बांबू वाहनांमध्ये भरण्यात आले आहे. पालखी रथाला, सिंहासन, पादुका, मेघडंबरी, प्रभावळ, दरवाजे, पूजा थाळ, चौरग, गरूड टक्के, अब्दागिरी यांना चकाकी दिली आहे. वारीचे मानकरी व मानाच्या दिंड्या देहूनगरीत येऊन दाखल होऊ लागल्या आहेत. त्यांना संस्थानच्या वतीने वाहन पास देण्यात येत आहे.
पालखी रथाला कॅमेरे आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. पालखी रथ नव्याने तयार करण्यात आला आहे. रथापुढे 27 व मागे 370 दिंड्या पालखीपुढे चालणारे मानाचा पेठ बाभूळगावकरांचा घोडा, तर दुसरा अकलूजच्या मोहिते पाटील यांचा घोडा पालखी सोहळ्यात सहभागी होईल. मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. यंदा वारीत पालखी रथापुढे 27 व मागे 370 दिंड्या सहभागी असणार आहेत.

पावसामुळे भाविकांची तारांबळ

देहू परिसरात पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. ठिकठिकाणी असलेले मोठमोठे गृहप्रकल्प यांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात, तसेच वर्गखोल्यांमध्ये भाविकांना तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंडवाल चौक व भैरवनाथ चौकात वारकर्‍यांसाठी तात्पुरत्या निवार्‍यासाठी शासनामार्फत प्रथम निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, त्या निवारा व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे.

Tukoba sets out to meet Vithuraya; the palanquin departs.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *