नाशिक; साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात प्राण्यांच्या बळी देण्यास परवानगी देऊ अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली. यामुळे 2017 च्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. राज्य सरकारच्या या आदेशाला आदिवासी विकास संस्थेने 2019मध्ये आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.