महाराष्ट्र

गतिमान प्रवासासाठी कसारा घाटात बोगदा उभारण्यात यावा



खा. गोडसेंचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक – जिल्ह्यातील प्रशासनाच्या रेल्वे विषयी अनेक समस्या आहेत.पंचवटी एक्सप्रेस रोज जाताना आणि येताना वेळेवर पोहचावी,नाशिक -मुंबई दरम्यानचा प्रवास सव्वादोन ते अडीच तासात व्हावा, मुंबईहून कसारा मार्गे देशभरात धावणाऱ्या शंभर एक्सप्रेसचा प्रवास गतीमान होण्यासाठी घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा उभारण्यात यावा. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याकडे केली.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले कीं, अनेक समस्या रेल्वे प्रवाशांना सतत भेडसावत असतात. प्रवाशांचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि विनाआयास व्हावा यासाठी रेल्वे विषयीच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशा आग्रही मागण्यांचे त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनमाड मुंबई,नाशिक मुंबई या दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वेगाडयांना अधिकचा वेग लागत असतो.सर्वच रेल्वेगाडया उशिराने धावत आणि पोहचत असल्याने प्रवाशांची मोठी कुंचबना होत असते.चाकरनाम्यांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस तर रोजच उशिराने धावत असल्याने कामगारांचे सव्हिस रिपोर्ट खराब होतात.कसारा – इगतपुरी या दरम्यानच्या घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा नसल्याने मुंबईहून कसारा मार्गे देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्या इच्छीत ठिकाणी उशिराने पोहचतात. या समस्यांतून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनांनी खा.गोडसे यांच्या अनेकदा तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी न्यायिक व योग्य असल्याने आज मुंबईत आयोजित केलेल्या संसद सदस्य समितीच्या बैठकीनंतर खा.गोडसे यांनी मुंबई रेल्वेचे महा०यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेतली.यावेळी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक समस्यांचे विशेष निवेदन दिले.यामंध्ये कसारा – इगतपुरी यादरम्यानच्या घाट परिसरात जमीन पातळीवर बोगदयाची उभारणी करण्यात यावी,नाशिक जिल्ह्यातील चौदा क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्यात यावेत. राजधानी, गोदावरी,देवगिरी, जनशताब्दी,पंजाब मेल,अमृतसर या गाड्यांना देवळाली कॅम्प स्टेशन येथे थांबा देण्यात यावा.पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बोगी असावी,चाकणनामांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस जाताना आणि येताना वेळेवरती पोहचवी,पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास वेगाने होण्यासाठी पंचवटीला दुहेरी इंजन बसवावे,नासिक येथून कल्याणमार्गे अजमेरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस ट्रेन उपलब्ध करून द्यावी,इगतपुरी -भुसावळ मेमूला लहवित रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, नाशिक – पुणे लोहमार्गासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, लेव्हल क्रॉसिंग ८४ A बारा तासांऐवजी चोवीस तासांचा करावा,नाशिकरोडच्या मालधक्क्यावर थांबत असलेल्या मालवाहू गाड्या शहराबाहेर नेण्यात याव्यात,नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागण्यांचा समावेश आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago