महाराष्ट्र

गतिमान प्रवासासाठी कसारा घाटात बोगदा उभारण्यात यावा



खा. गोडसेंचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक – जिल्ह्यातील प्रशासनाच्या रेल्वे विषयी अनेक समस्या आहेत.पंचवटी एक्सप्रेस रोज जाताना आणि येताना वेळेवर पोहचावी,नाशिक -मुंबई दरम्यानचा प्रवास सव्वादोन ते अडीच तासात व्हावा, मुंबईहून कसारा मार्गे देशभरात धावणाऱ्या शंभर एक्सप्रेसचा प्रवास गतीमान होण्यासाठी घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा उभारण्यात यावा. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याकडे केली.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले कीं, अनेक समस्या रेल्वे प्रवाशांना सतत भेडसावत असतात. प्रवाशांचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि विनाआयास व्हावा यासाठी रेल्वे विषयीच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशा आग्रही मागण्यांचे त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनमाड मुंबई,नाशिक मुंबई या दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वेगाडयांना अधिकचा वेग लागत असतो.सर्वच रेल्वेगाडया उशिराने धावत आणि पोहचत असल्याने प्रवाशांची मोठी कुंचबना होत असते.चाकरनाम्यांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस तर रोजच उशिराने धावत असल्याने कामगारांचे सव्हिस रिपोर्ट खराब होतात.कसारा – इगतपुरी या दरम्यानच्या घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा नसल्याने मुंबईहून कसारा मार्गे देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्या इच्छीत ठिकाणी उशिराने पोहचतात. या समस्यांतून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनांनी खा.गोडसे यांच्या अनेकदा तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी न्यायिक व योग्य असल्याने आज मुंबईत आयोजित केलेल्या संसद सदस्य समितीच्या बैठकीनंतर खा.गोडसे यांनी मुंबई रेल्वेचे महा०यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेतली.यावेळी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक समस्यांचे विशेष निवेदन दिले.यामंध्ये कसारा – इगतपुरी यादरम्यानच्या घाट परिसरात जमीन पातळीवर बोगदयाची उभारणी करण्यात यावी,नाशिक जिल्ह्यातील चौदा क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्यात यावेत. राजधानी, गोदावरी,देवगिरी, जनशताब्दी,पंजाब मेल,अमृतसर या गाड्यांना देवळाली कॅम्प स्टेशन येथे थांबा देण्यात यावा.पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बोगी असावी,चाकणनामांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस जाताना आणि येताना वेळेवरती पोहचवी,पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास वेगाने होण्यासाठी पंचवटीला दुहेरी इंजन बसवावे,नासिक येथून कल्याणमार्गे अजमेरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस ट्रेन उपलब्ध करून द्यावी,इगतपुरी -भुसावळ मेमूला लहवित रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, नाशिक – पुणे लोहमार्गासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, लेव्हल क्रॉसिंग ८४ A बारा तासांऐवजी चोवीस तासांचा करावा,नाशिकरोडच्या मालधक्क्यावर थांबत असलेल्या मालवाहू गाड्या शहराबाहेर नेण्यात याव्यात,नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागण्यांचा समावेश आहे.

Ashvini Pande

Recent Posts

अवघा तो शकुन

चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…

4 minutes ago

एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा

उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…

21 minutes ago

पांढुर्ली-भगूर रस्ता दुरुस्तीचे काम वेगात

दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल देवळाली कॅम्प : वार्ताहर भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून,…

29 minutes ago

लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये विठ्ठलनामाचा गजर

नाशिक : उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी…

33 minutes ago

ऑयस्टरच्या चिमुकल्यांकडून आषाढी एकादशी

सिडको : अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात…

34 minutes ago

युगे अठ्ठावीस… विटेवरी उभा !!

लखमापुर :  वार्ताहर  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकांचे…

42 minutes ago