महाराष्ट्र

गतिमान प्रवासासाठी कसारा घाटात बोगदा उभारण्यात यावा



खा. गोडसेंचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक – जिल्ह्यातील प्रशासनाच्या रेल्वे विषयी अनेक समस्या आहेत.पंचवटी एक्सप्रेस रोज जाताना आणि येताना वेळेवर पोहचावी,नाशिक -मुंबई दरम्यानचा प्रवास सव्वादोन ते अडीच तासात व्हावा, मुंबईहून कसारा मार्गे देशभरात धावणाऱ्या शंभर एक्सप्रेसचा प्रवास गतीमान होण्यासाठी घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा उभारण्यात यावा. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याकडे केली.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले कीं, अनेक समस्या रेल्वे प्रवाशांना सतत भेडसावत असतात. प्रवाशांचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि विनाआयास व्हावा यासाठी रेल्वे विषयीच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशा आग्रही मागण्यांचे त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनमाड मुंबई,नाशिक मुंबई या दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वेगाडयांना अधिकचा वेग लागत असतो.सर्वच रेल्वेगाडया उशिराने धावत आणि पोहचत असल्याने प्रवाशांची मोठी कुंचबना होत असते.चाकरनाम्यांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस तर रोजच उशिराने धावत असल्याने कामगारांचे सव्हिस रिपोर्ट खराब होतात.कसारा – इगतपुरी या दरम्यानच्या घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा नसल्याने मुंबईहून कसारा मार्गे देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्या इच्छीत ठिकाणी उशिराने पोहचतात. या समस्यांतून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनांनी खा.गोडसे यांच्या अनेकदा तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी न्यायिक व योग्य असल्याने आज मुंबईत आयोजित केलेल्या संसद सदस्य समितीच्या बैठकीनंतर खा.गोडसे यांनी मुंबई रेल्वेचे महा०यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेतली.यावेळी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक समस्यांचे विशेष निवेदन दिले.यामंध्ये कसारा – इगतपुरी यादरम्यानच्या घाट परिसरात जमीन पातळीवर बोगदयाची उभारणी करण्यात यावी,नाशिक जिल्ह्यातील चौदा क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्यात यावेत. राजधानी, गोदावरी,देवगिरी, जनशताब्दी,पंजाब मेल,अमृतसर या गाड्यांना देवळाली कॅम्प स्टेशन येथे थांबा देण्यात यावा.पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बोगी असावी,चाकणनामांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस जाताना आणि येताना वेळेवरती पोहचवी,पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास वेगाने होण्यासाठी पंचवटीला दुहेरी इंजन बसवावे,नासिक येथून कल्याणमार्गे अजमेरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस ट्रेन उपलब्ध करून द्यावी,इगतपुरी -भुसावळ मेमूला लहवित रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, नाशिक – पुणे लोहमार्गासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, लेव्हल क्रॉसिंग ८४ A बारा तासांऐवजी चोवीस तासांचा करावा,नाशिकरोडच्या मालधक्क्यावर थांबत असलेल्या मालवाहू गाड्या शहराबाहेर नेण्यात याव्यात,नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागण्यांचा समावेश आहे.

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

31 minutes ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

35 minutes ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

40 minutes ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

48 minutes ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

1 hour ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

1 hour ago