बहु-उत्पादन केंद्रामुळे कृषी उत्पादनांसाठी सुसज्ज बाजारपेठ

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 मोठे निर्णय

मुंबई :
राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि.27) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बैठकीत तरुणांना रोजगार, कंत्राटदारांचे थकलेले बिल, सरकारी जमिनीचा भाडेपट्टा कालावधी इत्यादी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्या क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे बहु-उत्पादन केंद्र उदयास आल्यामुळे, कॅम्पसमधील शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी आधुनिक आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होईल. तरुणांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य सरकारने बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने विशिष्ट संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचे ठरवले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ’पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार. पीएम सेतूमुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार आहे. कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा.
धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणार्‍या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार्‍या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. बहु-उत्पादन केंद्र उदयास आल्यामुळे, कॅम्पसमधील शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी आधुनिक आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होईल. सध्या, बरेच शेतकरी दलालांवर अवलंबून असतात किंवा त्यांचा माल विकण्यासाठी दूरच्या बाजारपेठेत जातात. नव्या हबमुळे, शेतमालाचीचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्री एकाच ठिकाणी शक्य होईल, ज्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात थेट फायदा होईल.

A well-equipped market for agricultural products due to the multi-product center

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *