महाराष्ट्र

आगीच्या घटनांमुळे ई-वाहन बाजार थंडावला

नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक वाहनांना (इव्ही) आगी लागण्याच्या घटनांमुळे वाहन उद्योगाच्या या नवीन विभागाची गती मंदावली आहे. एप्रिलमध्ये ईव्हीच्या विक्रीत घट झाली. मार्चमध्ये 77,244 ईव्हीची विक्री झाली, जी एप्रिलमध्ये 72,536 हजारांवर आली. दर महिन्याला विक्री वाढण्याऐवजी घटण्याची ही गेल्या वर्षभरातली दुसरी वेळ आहे.
पेट्रोलच्या उच्च किमतींमुळे देशातील ईव्हीची (प्रामुख्याने दुचाकी) विक्री मासिक आधारावर 25 ते 35 टक्क्यांनी विक्रमी वाढली आहे. व्हेइकल डॅशबोर्ड या अधिकृत वेबसाइटनुसार, मे 2021 मध्ये देशात 3,311 ईव्ही विकल्या गेल्या, ज्याने डिसेंबर 2021 पर्यंत 50 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर जानेवारीत विक्रीत थोडीशी घट झाली. फेब्रुवारीपासून, विक्री पुन्हा वाढू लागली आणि मार्चमध्ये ती विक्रमी 77,244 वर पोहोचली. मार्च महिन्याच्या अखेरीपासून ईव्ही दुचाकींना आगी लागणार्‍या घटना समोर येऊ लागल्या, त्यात अर्धा डझन लोकांना आपला जीव गमवावा लागला. ओला, प्युअर इव्हीआणि ओकिनाव्हा सारख्या अनेक कंपन्यांना त्यांच्या इव्ही परत मागवाव्या लागल्या. सरकारने नवीन ईव्ही स्कूटर लॉंच करण्यावर बंदी घातली असल्याचेही वृत्त आहे. या सर्व प्रकारामुळे खरेदीदारांच्या भावनेवर परिणाम होऊन एप्रिलमधील विक्री मार्चच्या तुलनेत साडेचार हजारांनी घटली.या सर्व प्रकारामुळे खरेदीदारांच्या भावनेवर परिणाम झाला आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये विक्री साडेचार हजारांपेक्षा जास्त घसरून 77,244 वर आली. ईव्ही पायाभूत सुविधा विकसित करणार्‍या ईव्ही ऊर्जा या कंपनीचे सीईओ संयोग तिवारी म्हणाले की आगीच्या घटनांनंतर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

36 minutes ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

44 minutes ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

58 minutes ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 hour ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 hour ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 hour ago