चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी
नांदगांव प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील दोन सोळा वर्षीय मुलींचा चिंचवीर तांडा येथे असलेल्या के टी बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ८ रोजी घडली
पूजा अशोक जाधव (वय १६ ) वर्ष तिची मैत्रीण खुशी देवा भालेकर ( १६ ) तसेच कावेरी देवा भालेकर ( १८ ) या तिघी कपडे धुण्यासाठी चिंचवीहीर तांड्याजवळ असलेल्या केटी बंधाऱ्यावर गेलेल्या असताना त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड यांनी पूजा अशोक जाधव ( १६ ) तसेच खुशी देवा भालेकर (वय १६ ) चिंचविहिर तांडा यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर वय ( वर्ष १८ ) हिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव येथे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…