नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने शहरातील वाहतूक बेटांमध्ये बसविलेले लोखंडी फलक अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात न घेताच हे फलक उभारण्यात येत आहेत.
महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील वाहतूक बेटांमध्ये लोखंडी फलक उभारले आहेत. त्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक बेटांमध्ये असणारी शोभिवंत फुलझाडेही तोडून टाकली. आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या वाहतूक बेटामध्ये बसविलेला फलक अगदी रस्त्याला खेटूनच आहे. अवजड वाहनाचा या फलकाला धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फलक अतिशय चुकीच्या दिशेला बसविण्यात आला असून, फलकाचा काही भाग थेट रस्त्यावरच आला आहे. या मार्गे अनेक अवजड वाहनेही जात असतात. कंटेनरचा धक्का लागला तरी हा फलक पडू शकतो. असे असतानाही संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने हा फलक बसविला आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी पाहणी करून संबंधित फलकाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे
माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश नाशिक: प्रतिनिधी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे…
नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी ने नाशिक पश्चिममधून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचा झेंडा फडकवणारे महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात अडव्यय हिरे यांनी प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटात…
महायुतीकडुन अखेर सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर समीर भुजबळ यांच्या भूमिकेकडे लक्ष मनमाड(प्रतिनिधी):- नांदगाव विधानसभा…
नांदगावमधून महायुतीकडून सुहास कांदे समीर भुजबळांसाठी महायुतीचे दरवाजे बंद नांदगांव : महेंद्र पगार महायुतीत सहभागी…
लढणार , भिडणार आणि जिंकणारच! दिनकर पाटील यांचा निर्धार नाशिक: प्रतिनिधी भाजपाने अकरा वर्षात स्थायी…