नाशिक

उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर आजचा उद्योग बंदचा निर्णय मागे

 

नाशिक : प्रतिनिधी
‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून तो  निषेधार्थ आहे. परंतु उद्योजक , कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्योजकांनी बंद मागे घ्यावा असे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाठविले. तसेच आरोपींना कठोर कारवाई होणारच असे आश्वासन देखील सामंत यांनी देऊन, या प्रश्नबाबत ७ किंवा ८ जुन रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे   शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती उद्योजकांच्या सुकानु समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गोपाळे यांनी दिली.
निमा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेले, उपाध्यक्ष किशोर राठी वरून तलवार ,डीजे जोशी, जोशी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ , योगेश पाटील, ज्ञानेश्वर
गोपाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोपाळे यांनी निर्णय जाहीर करण्यापूर्वी बेले यांनी सर्व उद्योग व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. उद्योग मंत्र्यांचे लेखी पत्र, भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी फोनवर कंपनीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. परंतु उद्योग हितासाठी  चांगले कार्य सुरू असताना तुम्ही एक पाऊल मागे या अशी विनंती सर्वांनी केली. आरोपीवर कठोर कारवाईचे देखील आश्वासन दीले. त्यामुळे बेले यांनी उद्योग बंदचा निर्णय मागे घ्यावा  अशी विनंती सुकानु  समितीला केली. त्यानंतर सुकानु समिती तर्फे गोपाळे यांनी निर्णय जाहीर केला. बंदला सर्वच उद्योग संघटना, सिटू सह इतर  कामगार संघटनेनेही पाठींबा दिल्याचे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
सिन्नर इंडस्ट्रीज मन्यू फॅक्चर असोसिएशन तर्फे बनावट लेटर हेड वर उद्योग बंदला पाठिंबा नसल्याचे सर्वत्र व्हायरल झाले.ते कोणीतरी चुकीच्या लोकांनी केल्याचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले. संस्थेचा प्रव क्ता लवकरच जाहीर करू असेही राठी म्हणाले. आम्ही कायम उद्योग विकासासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

10 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago