नाशिक

नुकसानभरपाई लाभासाठी अ‍ॅग्रिस्टॅक बंधनकारकच!

बनावट शेतकर्‍यांना बसणार आळा, निधी वाचणार

निफाड ः विशेष प्रतिनिधी
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या सर्व योजनांच्या लाभासाठी अ‍ॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसानभरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे.
परिणामी शेतकर्‍यांची ओळख पटविणे आणि खर्‍या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार आहे. बनावटगिरीला आळा बसणार आहे. यातून राज्य सरकारचा निधीही वाचेल. येत्या 15 जुलैपासून अर्थात खरीप हंगामात याची अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
अ‍ॅग्रिस्टॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकर्‍यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकर्‍यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) याचे संकलन केले जात आहे. शेताचे भूसंदर्भाचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे. महसूल अधिकार अभिलेखातील शेतकर्‍याची माहिती संकलित केली जात आहे.
मदत व पुनर्वसन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या पीक, शेतजमिनीच्या नुकसानीपोटीच्या भरपाईसाठी मदत दिली जाते. ही मदत महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांकडून होणार्‍या पंचनाम्याच्या आधारे दिली जाते. पीक नुकसानभरपाईसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यात एक रकाना शेतकरी ओळख क्रमांकासाठी ठेवण्यात येणार आहे, असे समजते. भरपाई वाटपाच्या डीबीटी प्रणालीतही एक रकाना शेतकरी ओळख क्रमांकासाठी तयार करून त्यात हा क्रमांक टाकण्यात येणार आहे.

पंचनाम्यात ओळख क्रमांक

राज्यात टप्प्याटप्प्याने ई-पंचनामा सुरू करताना पंचनाम्यात ओळख क्रमांक बंधनकारक राहील,

असेही त्यात नमूद आहे. शेतकर्‍याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून

प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या शेतासह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी अ‍ॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकर्‍यांना

देण्यात येणारा ओळख क्रमांक 15 जुलैपासून बंधनकारक केला आहे.

हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍याचा आधार क्रमांक संलग्न करण्यात येणार आहे.

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago