मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे, 1 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही उभी फूट पडली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली30 आमदार सरकारला पाठिंबा देणार आहेत, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा देखील अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा आहे. आज सायंकाळी अजित पवार यांच्या सह 9 जण सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेणार आहेत, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहे, विशेष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये अजित पवार निधी देताना अन्याय करत होते असा आरोप करून सत्तेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे आमदार आता पुन्हा अजित दादा पवार यांच्यासोबत सत्तेत एकत्र आले आहेत, गेल्या अडीच वर्षात चौथ्यांदा राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत, पहाटेच्या शपथ विधी नंतर महाविकास आघाडी चा त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि आता पुन्हा राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट असा एकत्रित मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे,
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…