मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे, 1 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही उभी फूट पडली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली30 आमदार सरकारला पाठिंबा देणार आहेत, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा देखील अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा आहे. आज सायंकाळी अजित पवार यांच्या सह 9 जण सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेणार आहेत, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहे, विशेष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये अजित पवार निधी देताना अन्याय करत होते असा आरोप करून सत्तेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे आमदार आता पुन्हा अजित दादा पवार यांच्यासोबत सत्तेत एकत्र आले आहेत, गेल्या अडीच वर्षात चौथ्यांदा राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत, पहाटेच्या शपथ विधी नंतर महाविकास आघाडी चा त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि आता पुन्हा राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट असा एकत्रित मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे,
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…