अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाची माघार

ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई: अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके आणि मुर्जी पटेल यांच्यामध्ये लढत होणार होती, मात्र काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून ही निवडणूक भाजपाने लढू नये अशी मागणी केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांची जपणूक करावी असे आवाहन केले होते आज सकाळी तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली त्यानंतर भाजपाने या जागेवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऋतुजा लटके यांचे विजयाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे

Ashvini Pande

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

16 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

17 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

17 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

17 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

17 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

17 hours ago