आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित
सिडको विशेष प्रतिनिधी
-भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि त्यातील SEED विभागा मार्फत नवीन तंत्रज्ञान विकासनाचे मोलाचे कार्य केले जाते, ज्यात ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी विविध संशोधन तसेच विविध लोक उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले जातात. त्याच संशोधनाचा एक भाग म्हणून भारतातील जनावरांना ने आण करण्यात होणाऱ्या इजा आणि त्रासाचा विचार करून, उपलब्ध गाड्यांवर बसवता येणारे, कमी खर्चिक, चढ उतरण्यास सोपे असा पिंजरा जोडणी आणि दरवाजा (रॅम्प) गुरु गोबिंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राध्यापक संदीप पाटील यांनी त्यांच्या संशोधन अभ्यासात तयार केला. ज्याचा उपयोग हा नक्कीच पुढील काळातील जनावरांच्या संरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने इतर वाहनावर जोडण्यासाठी होईल.
भारतात गुरांची वाहतूक प्रामुख्याने सामान्य मालवाहू वाहनांवर केली जाते, ज्यामध्ये गुरांना गाडीत चढवणे आणि उतरवणे (लोडिंग आणि अनलोडिंगसाठी) कोणतेही विशेष बदल केलेले नसतात. या साठी बाजार समितीत किव्हा गौशाळेत एखाद्या बांधलेल्या चौथऱ्याचा वापर करताना दिसतात, मात्र, अश्या गाडयांना शेतांमध्ये किंवा रस्त्याच्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये मोठी अडचण ठरते, ज्यामुळे प्राण्यांना तणाव आणि संभाव्य दुखापती होऊ शकतात. या प्रकल्प अभ्यासाचा(प्रोजेक्टचा) उद्देश भारतातील शेतकरी आणि वाहतूकदारांच्या गरजे नुसार आणि गाडीच्या आकारा नुसार उभारू शकणारे (मॉड्युलर) आणि लवचिक पिंजरे(केज) तयार करणे आहे. यात गुरांच्या वाहतूकि साठी उघड झाप होऊ शकणारे आणि उतार असलेला दरवाज्याची (अडजस्टेबल रॅम्प) जोडणी करण्यात आली आहे, जे गुरांना गाडीत चढवण्याचा मार्ग (लोडिंग प्लॅटफॉर्म) म्हणून कार्य करते आणि वाहनासाठी सुरक्षित सुरक्षा दरवाजा म्हणूनही वापरले जाऊ शकते. समन्व्ययांकानी आपल्या वडिलांप्रतीच्या कृतज्ञतेतून ह्या पहिल्या प्रयत्नास “सुभाष गौसेवा वाहन” असे नाव दिले.
गुरुगोविंद सिंग अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांनी ह्या प्रक्लपातील विशेष बाबींचा उल्लेख करून समन्वयक प्रा. संदीप पाटील यांचे कौतुक केले आणि पुढील संशोधनास प्रेरणा दिली. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हर्जित आनंद, सचिव स. कुलजितसिंग बिर्दी आणि सर्व कार्यकारी सभासद यांनी ह्या प्रकल्पाची प्रात्यक्षिकरित्या माहिती घेऊन असे प्रकल्प आणि संशोधन पुढे चालावे या करता प्रोत्साहित केले. हा प्रकल्प यशस्वीपने पूर्ण करताना होणाऱ्या सह्कार्या बद्दल समन्वयक पाटील यांनी फौंडेशनचे सर्व सभासद, प्राचार्य  डॉ निकम , सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे आभार मानले.
Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

9 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

9 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

9 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

9 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

9 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

10 hours ago