पुणे : पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला आहे . या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे . आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला . यावेळी तसेच यावेळी गद्दार गद्दार अशी घोषणाबाजीही करण्यात आली . आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानं तर तेथून उदय सामंत यांचा ताफा जात होता . यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला . दरम्यान , या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे . आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत . आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे . त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे . त्यासाठी आदित्य ठाकरेंची यात्रा सुरू आहे , असे केसरकर म्हणाले .
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…