महाराष्ट्र

अवकाळी पावसाचा फटका ;पिकांचे नुकसान

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात काही भागात मेघगर्जनेसह  पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार काल राज्यातील काही भागात बैमोसमी पावसाने हजेरी लावली . नाशिक शहरातही गुरूवारी  दिवसभर ढगाळ वातावरण होते .तर जिल्याचा ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. बेमोसमी पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात काढणी केलेला कांदाही पूर्णपणे पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांद्यावर अवलंबून असणार्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वार्‍यामुळे शेतकर्‍यांचे पत्र्याची शेड, तसेच काही ठिकाणी वृक्ष व विजेचे खांबही कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. हवामान विभागातर्फे आणखी दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.तर शहरात येत्या काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

8 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago