कायद्याचा आधार तरीही निराधार

संपत्तीचा ताबा मिळताच बदलते मुलांचे वागणे

नाशिक :प्रतिनिधी

माता पित्यांना वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर मुलांकडून विविध प्रकारे पालकांची पिळवूण करण्यात येते.पालकांना भावनिकरित्या अडकवत मुले संपत्ती ,दागिणे ,यासह इतर प्रकारच्या अर्थिक मालमत्तेतून पालकांना बेदखल करतात.शिवाय वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर मुलांकडून माता पित्यांचा महिन्याच्या उदरनिर्वाहाचा खर्चही देण्यात येत नाहीत. ज्या वृद्धांना पेशन्स असते त्यांना  उदरनिर्वाह चालवणे शक्य असते मात्र ज्यांना पेशन्स नाही मिळत अशा वृद्धांचे मात्र प्रचंड हाल होतात..त्यांना हक्काचे घर असताना घरी रहाता येत नाही आणि पैसे नसल्याने वृद्धाश्रमातही राहणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत कायदेशीर मार्गाचा अवलंब करत हक्क मिळवावा लागतो..
मात्र वृद्धांना अशा परिस्थितीत काही प्रमाणात तेही जबाबदार असतात..कारण त्यांना कायदेविषयक  तरतुदींची माहिती नसते. कायदेशीर मार्गाने हक्क मिळवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कायद्याचे ज्ञान नसल्याने फसवणूक

पालकांचे मुलांवर असलेले प्रेम असतेच.अशा स्थितीत मृत्युपत्र करत संपत्ती मुलांच्या नावावर करण्यात येते.मात्र संपत्तीचा ताबा मिळाल्यानंतर मुलांच्या वागण्यात बदल होतो. पालकांना वृद्धाश्रमात पाठवण्यात येते.शिवाय तिथे पाठवल्यावरही दुर्लक्ष करण्यात येते.मात्र मृत्युपत्र करत असताना जर मृत्युपश्चात संपत्तीचा हक्क मुलांना मिळेल असे नमुद केलेले असेल तर वृद्धांचा मुले सांभाळ करतात .मृत्युपत्रासंबधीचे कायदे माहित नसतात. तसेच मुलानी संपत्तीतून बेदखल केल्यानंतर  कायद्याची माहिती नसल्याने हक्क मिळवता येत नाही.

या माध्यमातून होते पिळवणूक

1.मृत्युपत्रात बदल करण्यास तगादा

2.संपत्ती नावावर करण्यासंदर्भात

3.भावनिकरित्या फसवणूक करत संपत्ती मिळवणे .

4.पालकांची  पेशन्स खोट्या सहीने परस्पर उचलणे

5. पालकांच्या नावाने लोन /कर्ज काढत पिळवणूक

ज्येष्ठांच्या हक्कासाठी हे आहेत कायदे:

1.भारतीय दंड संहितेचे कलम 125(1)(ड)अन्वये मुलांकडून निर्वाह करण्यास उपेक्षा केली किंवा मुलांनी निर्वाह नकार दिला आई वडिलांना मासिक निर्वाह भत्ता /खावटी मिळणे कामी न्यायालयात अर्ज करता येतो.

2.आई वडिलांचा व ज्येष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अर्थात ज्येष्ठ नागरिक कायद्यात विशेष तरतुदीनुसार मुले सांभाळत नसल्यास अशा तक्रारी थेट उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करता येते.व आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या उत्पन्नातून मासिक भत्ता ज्येष्ठांना मिळवता येतो.

 

 

मुलांकडून पालकांवर अन्याय केल्यानंतर त्यांना न्याय कसा मिळवायचा याची माहिती नसते. मात्र वृद्धाच्या हक्कांसाठी राज्यघटनेत अनेक कलम आहेत. कोणत्याही वृद्धांवर मुलांकडूनच अर्थिक पिळवणूक होत असेल तर त्यांनी कायद्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

अॅड. शुभांगी सोनवणे (कायदेविषयक अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *