उत्तर महाराष्ट्र

नाशिक विभागाला 1 लाख 42 हजार क्विंटल बियाणे मिळ्णार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विभाग व जिल्हास्तरावर आगामी खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्हयासह विभागासाठी कृषी विभागाकडून 8 लाख 84 हजार खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 7 लाख 69 हजार मेट्रीक टन मंजूर करण्यात आले आहे. बियाणांच्या बाबतीत नाशिक विभागासाठी 1 लाख 42 हजार क्विंटल बियाणे मिळ्णार आहे. यामध्ये एकटया नाशिक जिल्हयासाठी 72 हजार 395 क्विंटर बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विभागीय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपासून खरीप हंगामाचे खते व बियाणांचे जोरदार नियोजन सुरु होते.


दरवर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन केले जात असून, नाशिक जिल्हा अन विभागात कुठेही शेतकर्‍यांना खते, बियाणांंची कमतरता भासू नये याकरिता कृषी विभाग प्रयत्नशील असतो. गेल्या वर्षी खतांसाठी शेतकर्‍यांमध्ये कुठेही नाराजी व आरडाओरड झाली नाही. विशेषत: कोरोनासारख्या काळात देखील कृषी विभागाने यशस्वीपणे आपले नियोजन पूर्ण करत शेतकर्‍यांचे हाल होणार नाही, याकरिता काळ्जी घेतली. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होनार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आतापासूनच तयारीला लागला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडयानंतर शेतकर्‍यांकडून पेरणीच्या कामांना गती दिली जाते. काही शेतकरी अगदी तीसर्‍या ते चौथ्या आठवडयात शेतीचे कामे करणे पसंत करतात. बियाने व खते यांची कमतरता भासू नये याकरिता अनेक शेतकरी हे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात किंवा जूनच्या पहिल्याच आठवडयात खते व बियाने घेण्यासाठी बाजारात गर्दी करीत असतात. दरम्यान खते व बियानांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर राहणार आहे. विशेषत: खते विक्री करताना शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, यासाठी नाशिक जिल्हयासह, धुळे, नंदूरबार, जळ्गांव येथील कृषी विक्री केंद्रावर करडी नजर असणार आहे. नाशिक जिल्हयासाठी 72 हजार 397 क्विंटल, धुळे 26 हजार 200, नंदूरबार 13 हजार 217 व जळ्गांव जिल्हयाकरिता 31 हजार 85 क्विटल बियानांची मागणी केली आहे. या बियाण्यांमध्ये कापूस व सोयाबीनचे बियाने धरलेले नसून मका, बाजरी, मुंग, ज्वारी आदींसह खरीप हंगामातील बियाण्यांंचा समावेश आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

11 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

11 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

12 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

12 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

12 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

12 hours ago