बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने

खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

नाशिक : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बोधले नगर परिसरातील एका प्रख्यात बिल्डरने सर्व्हे क्रमांक 825 मध्ये
बांधकामाच्या साईटवर गेल्या आठ महिन्यापासून मोठ्या प्रकल्पासाठी 100 X 100 मीटर आणि 30 मीटर खोल असे मोठमोठे खड्डे केलेले आहेत.काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये अनेक महिन्यापासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे.

संबंधित बिल्डरने एक तर काम सुरू करावे.अथवा या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील संतप्त रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तसेच पूर्व विभाग विभागीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला देखील निवेदन देण्यात आले. तथापि, या बिल्डर नामवंत असल्यामुळे रहिवाशांच्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.महापालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नंदन बगाडे, रमेश पाटील माधुरी जैन, बापू शौचे,रमेश पगारे, खैरे, क्षीरसागर, जेजुरकर, कडाळे, बेंडकुळे, महिंद्र निकमसह परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.

कारवाई होत नसल्याने नाराजी
या मोठ्या प्रकल्पावर बिल्डर तर्फे सुरक्षारक्षक नाही. मोकळ्या भूखंडामध्ये गाजरगवत वाढलेले असुन बांधकामात पाण्याचा वापर करण्यासाठी मोठ्या खड्ड्यात साचलेल्या घाण पाण्यामुळे  रोगराई पसरून मलेरिया,डेंग्यू सदृश्य डासांची निर्मिती झाल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक विविध आजाराने त्रस्त झाले आहेत. महापालिकेने तात्काळ पाहणी करून कारवाई करावी.यासंदर्भात  महानगरपालिकेला वारंवार  लेखी निवेदन तक्रारी या ऑनलाईन कंप्लेंट  ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित विभागांना केल्या त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिका  आयुक्तांना तसेच पोलीस प्रशासनाला पाठवली आहे.दरम्यान नागरिकांच्या या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि  लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

मोठ्या खड्ड्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त दुषित पाण्याच्या प्रश्नाबरोबर लहान मुले खेळायला जातात या पाण्यात बुडून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? याठिकाणी बांधलेल्या शेडमध्ये टवाळखोरांचा तसेच गुन्हेगारी वृत्ती असलेल्या अल्पवयीन तसेच  गुंडांचा वावर वाढला असून दारूच्या पार्ट्यामुळे तसेच  गांजा सारखे अमली पदार्थांचे व्यसनांमुळे महिलांच्या छेडखानीत  वाढ झाली असून नुकतेच आंबेडकरवाडीला रंगपंचमीला गाजलेले दुहेरी हत्याकांड या ठिकाणापासून अवघे 200 मीटर अंतरावर आहे. संभाव्य घटना टळावी यासाठी उपनगर पोलिसांनी बंदोबस्त करून रहिवाशांना दिलासा द्यावा.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago