नाशिक

तुळजापूरजवळ बोलेरोला अपघात; चासचे तीन तरुण ठार

तामलवाडी गावाजवळील घटना;सहा गंभीर जखमी,
सिन्नर ः प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर कटारे मिल समोर मंगळवारी (दि.21) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या बॅलेरो गाडीचे टायर फुटून गाडी उलटल्याने तिघांचा जागेवर चिरडून मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. निखिल रामदास सानप (23), अनिकेत बाळासाहेब भाबड (23), अथर्व शशिकांत खैरनार (22) सर्व रा. चास, ता. सिन्नर असे मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे चाससह भोजापूर खोरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चास येथील नऊ भाविक बॅलेरो गाडीने (क्र.एम.एच 12 ई.एक्स 3211) सोमवारी (दि.20) रात्री 10 च्या दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी सोलापूरहुन तुळजापूरच्या दिशेने जात होते. तूळजापूर अवघे 15 मिनीटांच्या अंतरावर राहीले असतांना तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ पहाटे 6.30 वाजेच्या दरम्यान धावत्या गाडीचे पाठीमागील उजवे टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्‌ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक बबन बिडगर (23), तुषार दत्तात्रय बिडगर (21) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर गणेश ज्ञानदेव खैरनार (35), जीवन सुदाम ढाकणे (26), शंकर बाळासाहेब भाबड (23), पंकज बाळासाहेब खैरनार (28) हे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताचा तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने, आयआरबीच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर तामलवाडी पोलिसांनी पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

10 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago