नाशिक

नाशकात मोठे प्रकल्प आणणे हीच केशुब महिंद्रा यांना खरी श्रद्धांजली ठरेल-ना. भुसे

नाशिक: प्रतिनिधी

महिंद्रासह अन्य कंपन्यांनाशी आपण प्रत्यक्ष संवाद साधणार.वेळप्रसंगी सवलती देऊन मोठे प्रकल्प नाशकात आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि तीच केशुब महिंद्रा यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे उद्गार नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी काढले.
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन केशुब महिंद्रा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी औद्योगिक व सामाजिक संघटनांच्या वतीने सातपूर येथील बीएलव्हीडी हॉटेलमध्ये आयोजित नाशिक मधील सर्व औद्योगिक संघटना सर्व सामाजिक संघटना व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नाशकात भव्य जागेत विस्ताराचे स्वप्न केशुब महिंद्रा बघितले होते मात्र काही करणास्तव त्यांचे हे स्वप्न सकार न झाल्याने तो प्रकल्प चाकणला गेला अशी खंत शोकसभेत निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी बोलून दाखविली होती त्याला उत्तर देतांना ना.दादा भुसे यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्व आहे.
नाशिकसह भारतभर लाखो चुली पेटविण्याचे काम केशुब महिंद्रा यांनी केले. ते शिस्तबद्ध व सचोटीचे जीवन जगले. औद्योगिक क्षेत्रात उंच शिखर गाठूनही त्यांचे पाय मात्र सतत जमिनीवरच राहिले,अशा शब्दांत ना. भुसे यांनी केशुब महिंद्रा यांच्या कार्याचा गौरव केला. नाशिकच्या विकासासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी आपण सारे एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ या,असेही ना. भुसे पुढे म्हणाले.
शोकसभेत महिंद्रा अँड महिंद्राचे माजी उपव्यवस्थापक अशोक सोनवणे, हिरामण आहेर, महिंद्राचे विद्यमान उपमहाव्यवस्थापक कर्नल बॅनर्जी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, ऊर्जा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय बोरस्ते, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा ,रा. स्व.संघाचे शहर संघचालक विजय कदम,मविप्रचे सरचिटणीस एड.नितीन ठाकरे, अभय कुलकर्णी,भाजपाचे महानगराध्यक्ष गिरीश पालवे,निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी,नरेडकोचे सुनील गवांदे, शिरीष भावसार आदींनीही आपल्या शोकभावना व्यक्त कारतांना केशुब महिंद्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला.केशुब महिंद्रा कर्णापेक्षाही उदार होते.त्यांनी आयुष्यभर बिझिनेस नव्हे तर माणुसकीला प्राधान्य दिले. नाशिकच्या विकासात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांनी कधीच जातीभेद मानला नाही अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नागपूर दौऱ्यावर असल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांच्या स्नुषा सौ. शेफाली भुजबळ यांनी यावेळी त्यांचा शोकसंदेश वाचून दाखविला.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्रनाना फड, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago