तत्पर बस चालकामुळे वाचले प्रवासी
लासलगांव प्रतिनिधी
लासलगाव आगारावरून सुटलेली लासलगाव – नाशिक सकाळी आठ वाजेची बस मंगळवारी हॉटेल मिरची औरंगाबाद रोड या ठिकाणाहून जात असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशी सुरक्षित बचावले.याच ब्लॅक स्पॉट वर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाश्यांचा बळी गेला होता.ही घटना ताजी असतांना लासलगाव आगराच्या चालका ने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली
लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस ही साडे नऊ वाजेच्या सुमारास जात असताना अचानक हॉटेल मिरची च्या जवळ बस चे ब्रेक फेल झाल्याने चालक पी व्ही भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करत बस मधील जवळपास ७५ प्रवाश्यांना सुरक्षित पणे आडगाव नाका पर्यंत पोहचवले.यावेळी वाहक डी यु राठोड यांनीं सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बस मध्ये बसवत रवाना केले.चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाश्यांकडून या दोघांचे आभार व्यक्त करण्यात आले.
लासलगांव आगारातील बसेसचा दर्जा हा अंत्यंत खालावलेला असून अनेक नादुरुस्त बस या रस्त्यावर चालत आहे.कोरोना पूर्वी लासलगाव बस आगारात ५६ बसेस या प्रवाश्यांच्या सेवेसाठी होत्या.मात्र आत्ता फक्त ३४ बसेस लासलगाव सेवेत आहेत.बस आगारकडून मागणी करूनही नवीन बसेस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…