नाशिकमध्ये घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर
रेडीरेकनर दरात ७.३१ टक्के वाढ
नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने काल (दि.३१) नवीन आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला रेडी रेकनर दर जाहिर केले.कोरोना संकटानंतर मागील दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात शासनाने वाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा आर्थिक वर्षासाठी शासन रेडीरेकनर दरात वाढ करेल ही शक्यता खरी ठरली आहे. नाशिक शहरात ७.३१ टक्के इतकी दर वाढ केल्याने नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
राज्य सरकारने तब्बल दोन वर्षानंतर २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी रेडिरेकनर दरात मोठी वाढ केली असून नाशिक शहरासाठी ही वाढ ७.३१ टक्के इतकी आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू राहणार आहे. दरम्यान आधीच घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असताना दरवाढीमुळे घर खरेदीचे स्वप्नाला ब्रेक लागू शकतो. दरम्यान राज्यात सर्वाधिक दरवाढ (मुंबई वगळून) ही सोलापूर शहराची असून ती १०.१७ टक्के इतकी आहे.
ऐकावे ते नवलच: बंगला बळकावण्यासाठी बिल्डरनेच दिली दरोड्याची सुपारी
रेडीरेकनर दरात वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. त्याचा थेट परिणाम सदनिकांच्या किमतीत वाढ होईल. त्यामुळे शहरातील सदनिकांच्या किमंतीत मोठी वाढ होणार आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महाग होणार असून ग्राहकांच्या खिशाला झळ सोसावी लागेल. जीएसटी, विक्री कर, यानंतर तिसर्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून मिळते.राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील गेल्या दोन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्रीची रक्कम विचारात घेत वेगवेगळ्या भागांत वाढीचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार असल्याने याचा परिणाम थेट खरेदी-विक्री व्यवहारावर होणार असून यात तब्बल साडे सात टक्के वाढ झाल्याने रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांना अधिकचा कर, स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन शुल्क या सह एजंटची फी या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा फटका तर बसणार आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…