नाशिक

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार

लासलगाव : वार्ताहर
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.आगामी रब्बी हंगामात नियोजन करताना शेतकर्‍यांना नाकीनऊ येत आहे. ताळमेळ जुळत नसल्याची शेतकर्‍यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.
ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकर्‍यांचे कोलमडले आहे. हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे 200-250 रुपयांची वाढ झाली आहे. सुरू होत असलेल्या रब्बी हंगामात खताच्या किमती अस्मानाला भिडल्यामुळे शेतकर्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून, उत्पादन खर्चात भर पडणार आहे.
एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. खतांच्या जुन्या व नवीन दरांमध्ये मोठी तफावत असून, शेतकर्‍यांना 200 ते 250 रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. उन्हाळी कांदा व इतर पिकासाठी लागणारा रासायनिक खतांचा डोसदेखील आवश्यकच असतो. त्यामुळे शेतकरी सध्या खत खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत. तेव्हा खतांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.निफाड तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाला जास्त प्राधान्य देतात.

सध्या कांद्यासाठी एकरी चार बॅग रासायनिक खत लागत असून, खतांच्या किमतीमध्ये प्रतिगोणी 200 ते 250 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. एकीकडे शेतमालास भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती वाढत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
-बबनराव शिंदे, खत विक्रेते, लासलगाव

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago