शहरात आढळले क्षयरोगाचे 6 रुग्ण

30 सप्टेंबरपर्यंत शोधमोहीम सुरू राहणार

नाशिक : गोरख काळे
नाशिक महानगरपालिकेकडून मंगळवार(दि.13)पासून शहरात क्षयरोग व कृष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत पालिकेने नेमेलेल्या पथकाला 6 रुग्णांना क्षयरोग झाल्याचे तपासणीत समजले आहे. मोहीम सुरू झाल्यापासून 50 हजार 66 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यासाठी 146 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथके 48 हजार 436 घरांना भेटी देऊन 2 लाख 42 हजार लोकसंख्येची तपासणी करणार आहेत. हे पथके घरोघरी जाऊन तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक तपासणी झालेल्या घरावर एल अक्षर, क्रमांक व तारीख नोंदविण्यात येत आहे. सदर मोहिमेस नागरिकांनी सहभागी करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. मोहिमेत रोगाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची मनपाच्या रुग्णालयात मोफत एक्स-रे तपासणी औषधोपचार सुरू करण्यात येत आहे. उपचार सुरू असेपर्यंत या क्षयरुणांना निक्षय पोषण योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago