निर्मितीक्षमता ही समाजाला नवी दिशा देते

वसंत आबाजी डहाके : गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण

नाशिक : प्रतिनिधी
माणसं अजूनही चांगले काम करतात, त्या कामाचे कौतुक करणारी संस्था असते. इतकं मोठं काम ही माणसं करत जगणं समृद्ध करतात. या उपक्रमाच्या मागे तात्यासाहेबांची दृष्टी आहे. निर्मितीक्षमता ही समाजाला नवी दिशा देणारी असते, असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले. त्यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.10) गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शिरवाडेत दहा हजार रोपेे लावणार : सयाजी शिंदे

शिरवाडे गावात कुसुमाग्रजांच्या नावाने दहा हजार रोपेे लावणार.
वर्षाला दोन हजार रोपेे लावणार, असे अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले. कुसुमाग्रजांच्या साहित्याची जपवणूक करत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवू, असे अभिनेते शिंदे म्हणाले.

यांचा झाला सन्मान

डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), आशिष माने (साहस), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Creativity gives a new direction to society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *