आज दीप अमावास्या खवय्यांची मात्र गटारी!

नाशिक : अश्‍विनी पांडे
आज दीप अमावास्या. चातुर्मासातील पहिली अमावास्या आषाढ अमावास्या असते. आषाढ एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील दीप अमावास्या समाप्तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणातला जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही उपवासाच्या सणांशी संबंधित असतो. आज दीप अमावास्या प्रारंभ होणार असून, या वर्षी 28 जुलै रोजी दीपपूजन केले जाणार आहे. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. दिवा लावला जातो आणि दानधर्म केले जाते. दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, या वर्षी अमावास्या तिथी बुधवार, 27 जुलै रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी गुरुपुष्ययोगासोबत अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धीसारखे महायोग आहेत. लोक या दिवशी उपवास देखील करतात. अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दीपपूजन केले जाते.
मांसाहारींची पंचाईत
आज दीप अमावास्या त्याचप्रमाण गटारीदेखील आहे. दीप अमावास्येनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार असल्याने श्रावणात मांसाहार घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे मांसाहारप्रेमी खवय्यांकडून गटारीचे औचित्य साधत मांसाहारावर ताव मारला जातो. मात्र, यंदा गटारी गुरुवारी आल्याने मांसाहार करणार्‍यांची पंचाईत झाली. त्यामुळे अनेकांनी कालच गटारी साजरी केली. त्यामुळे दीप अमावास्येप्रमाणे गटारीही साजरी करण्याची परंपरा आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

12 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

13 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

13 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

13 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

13 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

13 hours ago