निफाड : प्रतिनिधी
मुख्य बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जाणारा रस्ता धामोरी -कोपरगाव या राज्य मार्गावर अतिशय मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. हा रस्ता धामोरी येथील तसेच मायगाव देवी,चास नळी, मोर्वीस, मंजूर, सांगवी भुसार येथील शेतकरी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण समजला जातो. परंतु या रस्त्यालगत महिन्यापासून खडी आणून ठेवली आहे. तरी रस्त्याच्या कामाला अजून सुरुवात झाली नाही.ही खडी रस्त्यावर विखरल्याने वाहनचालकांमध्ये लहान-मोठे अपघातही होताना पहावयास मिळते. संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम चालू करून रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी, वाहनचालकांकडून होत आहे.