तरुण

दिल पे मत ले यार..!

टेन्शन, डिप्रेशन आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचललं जाणारं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत आहेत. मन हे दिसत नसले तरी जाणवते. त्यामुळे मनाच्या विरुद्ध काही होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात, ही सर्वांचीच इच्छा असते. पण, सर्वच इच्छा पूर्ण झाल्या तर जगण्याला काय अर्थ आहे.

थोडं पूर्ण, थोडं अपूर्ण असते म्हणून तर ते आयुष्य असते. मात्र, आजच्या काळात सर्वच गोष्टी एका क्लिकवर मिळत असल्याने गांभीर्य राहिले नाही. जर त्या गोष्टी नाही मिळाल्या तर मात्र खूप जास्त दुःख, निराशा पदरी पडते आणि त्यातूनच टोकाचं पाऊल उचललं जात. साध्या साध्या गोष्टी मनावर घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला जातो. जगण्यापेक्षा मरण खूप सोपं आहे, असंच आजच्या तरुण पिढीला वाटत आहे. आयुष्यात येणार्‍या संकटात झगडत आयुष्याचे मार्गक्रमण करणे जणू आजच्या तरुणवर्गाला न पटणारे आहे. त्यामुळेच प्रेम, करिअर यांसारख्या बाबतीत अपयश आले की, आत्महत्याला कवटाळणे हा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टीसाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत.आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत.सध्याचे स्पर्धात्मक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्यात शिक्षणातील स्पर्धा, प्रेमातील अपयश, नोकरी न मिळणे, अर्थिक चणचण यामुळे लहान वयातच चिंतेने तरुणाई ग्रासली जात आहे. त्यातच गॅझेटचा अति वापर व्हर्च्युअल जगात रमणारी तरुणाई प्रत्यक्षात मात्र अबोल आणि न व्यक्त होणारी आहे. याच अबोलपणाचे पर्यवसान पुढे आत्महत्यासारख्या घटनांत घडत आहे.चिंता ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. पण प्रत्येक संकटाला मार्ग असतो. पण हा मार्ग काढण्यासाठी आई -वडील, मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर व्यक्त होणे गरजेचे आहे. अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या तरुण पिढीत कमी असल्याची जाणवते. म्हणूनच असं टोकाचं पाऊल उचलण्याइतपत हिंमत तरुणवर्गात दिसते. एखाद्या बाबतीत चिंता सतावत असेल तर आपल्या प्रियजनांशी संवाद साधणं आणि त्यांची
मनःस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. आपलं मन अनेकदा दुखावलं जातं. त्याची कारणं अनेक असतात, कधी कौटुंबिक कलहांमुळे, शैक्षणिक किंवा नोकरीतील अडचणींमुळे तर कधी इतर नात्यांमधील वादविवाद अशा अनेक गोष्टींचा फरक आपल्या आरोग्यावर पडतो. या सर्व विचारांनी गोंधळून जाऊन अनेकदा तरुण आत्महत्या करतात. तरुणाई सोशल मीडियावरच्या आभासी दुनियेलाच खरी दुनिया मानून जगते. त्यामुळे त्या आभासी दुनियेत जरा चलबिचल झाली तरी त्यांच्या मनाची चलबिचल सुरू होते. वाढती स्पर्धा, वेगवान जीवनशैली, प्रत्येकाची पोटापाण्यासाठीची धडपड, स्वतःच्या प्रगतीसाठी चढाओढ याच्या नादात आपल्या माणसांकरिता पुरेसा वेळ नसतो आणि मग संवादाच्या अभावामुळे टोकाचे निर्णय घेतले जातात.संकटं ही नवीन उमेद घेऊन येतात असे मानले जाते. याच उक्तीचा विचार तरुणवर्गाने करायला हवा. कोणतीही गोष्ट अंतिम नसते. त्यामुळे मनाला न पटणार्‍या घडल्या की, आत्महत्या करण्याऐवजी त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षुल्लक गोष्टी मनावर न घेता जीवनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.

  अश्विनी पांडे

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

12 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

12 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

12 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

12 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

13 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

13 hours ago