तरुण

दिल पे मत ले यार..!

टेन्शन, डिप्रेशन आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचललं जाणारं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत आहेत. मन हे दिसत नसले तरी जाणवते. त्यामुळे मनाच्या विरुद्ध काही होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात, ही सर्वांचीच इच्छा असते. पण, सर्वच इच्छा पूर्ण झाल्या तर जगण्याला काय अर्थ आहे.

थोडं पूर्ण, थोडं अपूर्ण असते म्हणून तर ते आयुष्य असते. मात्र, आजच्या काळात सर्वच गोष्टी एका क्लिकवर मिळत असल्याने गांभीर्य राहिले नाही. जर त्या गोष्टी नाही मिळाल्या तर मात्र खूप जास्त दुःख, निराशा पदरी पडते आणि त्यातूनच टोकाचं पाऊल उचललं जात. साध्या साध्या गोष्टी मनावर घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला जातो. जगण्यापेक्षा मरण खूप सोपं आहे, असंच आजच्या तरुण पिढीला वाटत आहे. आयुष्यात येणार्‍या संकटात झगडत आयुष्याचे मार्गक्रमण करणे जणू आजच्या तरुणवर्गाला न पटणारे आहे. त्यामुळेच प्रेम, करिअर यांसारख्या बाबतीत अपयश आले की, आत्महत्याला कवटाळणे हा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टीसाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत.आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत.सध्याचे स्पर्धात्मक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्यात शिक्षणातील स्पर्धा, प्रेमातील अपयश, नोकरी न मिळणे, अर्थिक चणचण यामुळे लहान वयातच चिंतेने तरुणाई ग्रासली जात आहे. त्यातच गॅझेटचा अति वापर व्हर्च्युअल जगात रमणारी तरुणाई प्रत्यक्षात मात्र अबोल आणि न व्यक्त होणारी आहे. याच अबोलपणाचे पर्यवसान पुढे आत्महत्यासारख्या घटनांत घडत आहे.चिंता ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. पण प्रत्येक संकटाला मार्ग असतो. पण हा मार्ग काढण्यासाठी आई -वडील, मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर व्यक्त होणे गरजेचे आहे. अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या तरुण पिढीत कमी असल्याची जाणवते. म्हणूनच असं टोकाचं पाऊल उचलण्याइतपत हिंमत तरुणवर्गात दिसते. एखाद्या बाबतीत चिंता सतावत असेल तर आपल्या प्रियजनांशी संवाद साधणं आणि त्यांची
मनःस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. आपलं मन अनेकदा दुखावलं जातं. त्याची कारणं अनेक असतात, कधी कौटुंबिक कलहांमुळे, शैक्षणिक किंवा नोकरीतील अडचणींमुळे तर कधी इतर नात्यांमधील वादविवाद अशा अनेक गोष्टींचा फरक आपल्या आरोग्यावर पडतो. या सर्व विचारांनी गोंधळून जाऊन अनेकदा तरुण आत्महत्या करतात. तरुणाई सोशल मीडियावरच्या आभासी दुनियेलाच खरी दुनिया मानून जगते. त्यामुळे त्या आभासी दुनियेत जरा चलबिचल झाली तरी त्यांच्या मनाची चलबिचल सुरू होते. वाढती स्पर्धा, वेगवान जीवनशैली, प्रत्येकाची पोटापाण्यासाठीची धडपड, स्वतःच्या प्रगतीसाठी चढाओढ याच्या नादात आपल्या माणसांकरिता पुरेसा वेळ नसतो आणि मग संवादाच्या अभावामुळे टोकाचे निर्णय घेतले जातात.संकटं ही नवीन उमेद घेऊन येतात असे मानले जाते. याच उक्तीचा विचार तरुणवर्गाने करायला हवा. कोणतीही गोष्ट अंतिम नसते. त्यामुळे मनाला न पटणार्‍या घडल्या की, आत्महत्या करण्याऐवजी त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षुल्लक गोष्टी मनावर न घेता जीवनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.

  अश्विनी पांडे

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago