Oplus_131072
गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग वाढणार
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
शहर आणि जिल्हयात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गंगापूर व दारणा धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण व त्याच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला असून, आज बुधवार (दि. २० ऑगस्ट) सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता हा विसर्ग १,५०० क्यूसेस करण्यात येईल. धरणातील पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
नदीकाठच्या गावांना आवाहन
दरम्यान, विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना तसेच नदीपात्रात कोणतीही वसाहत, आठवडे बाजार किंवा शेतीसंबंधित कामे न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः आज बुधवारचा आठवडे बाजार नदीपात्रामध्ये किंवा पात्रालगत भरण्यात येऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…
सिन्नर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा प्रताप; ठेकेदार आणि अधिकार्यांचे संगनमत सिन्नर : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत…
अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी लासलगाव : वार्ताहर बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर…
काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांचे प्रचंड हाल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी…