नाशिक

‘स्थास्वसं’ची मतमोजणी पुढे ढकलल्याने नाराजी

पुणे : प्रतिनिधी
राज्यात बहुतांश ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 284 पैकी केवळ 24 ठिकाणच्या निवडणुका बाकी असताना, निवडणुका पार पडलेल्या भागातील निकाल राखून ठेवणे म्हणजे मतदारांसोबत केलेला भावनिक खेळ आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.3) व्यक्त केले. उच्च न्यायालयाने 1 डिसेंबरला पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालासंदर्भात दिलेल्या निर्देशाचे पालन करावे लागेल. मात्र, यापुढे निवडणुका घेऊन निकाल राखून ठेवण्याची वेळ आयोगावर येणार नाही, याची काळजी राज्य निवडणूक आयुक्तांनी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. येत्या काळात आयोगाला आणखी निवडणुका घ्यायच्या आहेत. अशात निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले. गेल्या चार ते पाच दशकांत पहिल्यांदाच अशाप्रकारे निवडणूक निकाल पुढे ढकलण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पडल्यानंतरच एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करावेत, असे निर्देश दिले आहेत. मात्र, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. असे असताना यंत्रणेच्या अपयशामुळे निकाल पुढे ढकलले जाणे योग्य नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago