नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

भात उत्पादक शेतकरी हवालदिल; पावसामुळे रोगट वातावरण

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वत्र भात पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी अवकाळी पावसाने बळीराजाची केलेली धावपळ व पेरणीपूर्व मशागतीला आलेला अडथळा, पेरणीनंतर झालेले नुकसान, आवणीला झालेला विलंब यांसह विविध संकटांना तोंड देत भात उत्पादक शेतकरी यंदा जेरीस आला आहे. मशागतीचा आणि मजुरीचा खर्च तीन ते चार पटीने वाढला आहे. संततधार पावसाने रोगट हवामान निर्माण झाले आहे. भात पिकाला वेगवेगळ्या कीड आजारांनी ग्रासले आहे.
तालुक्यातील भात हे प्रमुख आणि एकमेव पीक आहे. यंदा 15 हजार 993 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ही एकूण लागवडीच्या 92 टक्के आहे. तेच पीक आता हातातून जाणार असेल, तर वर्षभर खाणार काय? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. तालुक्यात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. खडी बरड जमिनीवर पावसाच्या पाण्यावर खरिपात जमेल तसे भाताचे पीक घेत आहे. त्यासाठी लागणारा भांडवली खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. बियाणे, पेरणी मशागत, आवणी, रासायनिक खते यासाठी झालेला खर्च प्रचंड आहे.
उधार उसनवार करून कशीबशी तोंडमिळवणी करत भात उत्पादक शेतकरी उसंत टाकत असतानाच रोगराईच्या अस्मानी संकटाने तोंडचे पाणी पळाले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शासनाच्या लाभाच्या योजना केवळ कागदावरच राहिलेल्या दिसतात.शासनाचा कृषी विभाग त्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यात अयशस्वी ठरला आहे. अगदी पीएम किसानचे 2000 रुपयेदेखील अनेक लाभार्थ्यांना मिळत नाहीत. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर प्रशासकीय राजवट असल्याने सर्वसामान्य शेतकरी दुर्लक्षित झाला आहे.

एकरी खर्चात दुप्पट वाढ

यंदा लागवडीचा खर्च वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती व माणशी मजुरीत झालेली वाढ. यामुळे लागवड खर्च मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. एकरभर क्षेत्रासाठी दहा हजार रुपयांच्या जागेवर वीस हजार रुपये आवणीचा खर्च आला आहे. तालुक्यात काही ठिकाणी निंदणीची कामे आटोपली आहेत, तर काही भागांत अद्याप सुरू झालेली नाही. तशात रोगराईचे संकट आले आहे.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago