उत्तर महाराष्ट्र

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा

मनमाड : आमिन शेख

मी आलो आणि तुफान पाऊस सोबत आला आंधी तुफान आम्हाला थांबवायला आला होता का हाच काय कोणताही तुफान आता आम्हाला थांबवू शकत नाही आपण एवढ्या पावसात येथे आला आणि सभेला उपस्थित राहिला याबद्दल तुमचे स्वागत निवडणुकीची तारीख घोषणा झाली इतर पक्ष जागा वाटपावर चर्चा करते आहे मात्र समाज वादी पार्टी तुमच्या सोबत उपस्थित आहे भारतीय जनता पार्टी हताश झालेली आहे लोकसभेत त्यांची हार झाली त्यामुळे या निवडणुकीत सर्व पर्याय ते वापरत आहे हरियाणात भाजप हारत असतांना ते जिंकले असले तरी महाराष्ट्रात महायुती हारणार म्हणजे हरणार असे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा खासदार अखिलेश यादव यांनी व्यक्त केले मालेगाव आणि धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अखिलेश यादव यांनी मालेगाव येथील जाहिर सभेत आपले मत व्यक्त केले.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की इंडिया आघाडीने भाजपला विरोध केला आहे भाजपाने चारशे पारचा नारा दिला ते बहुमतात सुध्धा आले नाही अशाच पद्धतीने महायुतीच सरकार ही येणार नाही महायुती सरकार म्हणजे महादुखी सरकार आहे, महा भ्रष्टाचार सरकार आहे महाराष्ट्रातील सरकार महायुतीचे हारणार सरकार आहे त्यामुळे केंद्रातील सरकार देखील पडणार आहे महाराष्ट्र सरकार हे रोजगार देणारे सरकार होते सगळे बेरोजगार झाल समाजवादी पार्टी हे सगळ्यांचा विचार करणारे सरकार आहे मोबलिंचींग अन्याय विरूध्द आम्ही लढा देणार आहोत लोकसभेत बिल सादर केल्यावर आम्ही विरोध केला मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बिल आणले जाते आहे जमीन खरेदी पार्टी म्हणून भाजपाची ओळख आहे असे यादव म्हणाले यावेळी विजांचा कडकडाट सुरू असताना यादव म्हणाले की आमच्या आवाजात ढगांचे आवजही सोबत आहे मालेगाव मधून समाज वादी पार्टी निवडणूक लढवणार आहे मालेगावचे लोक पावसाप्रमाने आम्हाला भरभरून मते देतील आणि भाजपला विरोध करतील बुलडोझर, एन्काऊंटर च्या विरोधात उत्तर प्रदेशची जनता आहे
खोटे नरेटीव्ह पसरवण्याचे काम भाजप करते आहे यांना धडा शिकवला पाहिजे यासाठी आपण इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराना मतदान करा असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले.

 

शान ए हिंद यांना मालेगावातून उमेदवारी जाहीर


मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी उतरणार आहे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने समाजवादी पक्षातर्फे शान ए हिंद निहाल अहमद यांना उमेदवारी जाहिर करत असुन संपूर्ण मालेगाव मधील जनतेने त्यांना भरगोस मते देऊन निवडून आणावे असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले तर याचवेळी त्यांनी रईस शेख यांना भिवंडीतून उमेदवारी जाहिर करत असल्याचे देखील सांगितले.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

7 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

7 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

7 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago