उत्तर महाराष्ट्र

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा

मनमाड : आमिन शेख

मी आलो आणि तुफान पाऊस सोबत आला आंधी तुफान आम्हाला थांबवायला आला होता का हाच काय कोणताही तुफान आता आम्हाला थांबवू शकत नाही आपण एवढ्या पावसात येथे आला आणि सभेला उपस्थित राहिला याबद्दल तुमचे स्वागत निवडणुकीची तारीख घोषणा झाली इतर पक्ष जागा वाटपावर चर्चा करते आहे मात्र समाज वादी पार्टी तुमच्या सोबत उपस्थित आहे भारतीय जनता पार्टी हताश झालेली आहे लोकसभेत त्यांची हार झाली त्यामुळे या निवडणुकीत सर्व पर्याय ते वापरत आहे हरियाणात भाजप हारत असतांना ते जिंकले असले तरी महाराष्ट्रात महायुती हारणार म्हणजे हरणार असे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा खासदार अखिलेश यादव यांनी व्यक्त केले मालेगाव आणि धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अखिलेश यादव यांनी मालेगाव येथील जाहिर सभेत आपले मत व्यक्त केले.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की इंडिया आघाडीने भाजपला विरोध केला आहे भाजपाने चारशे पारचा नारा दिला ते बहुमतात सुध्धा आले नाही अशाच पद्धतीने महायुतीच सरकार ही येणार नाही महायुती सरकार म्हणजे महादुखी सरकार आहे, महा भ्रष्टाचार सरकार आहे महाराष्ट्रातील सरकार महायुतीचे हारणार सरकार आहे त्यामुळे केंद्रातील सरकार देखील पडणार आहे महाराष्ट्र सरकार हे रोजगार देणारे सरकार होते सगळे बेरोजगार झाल समाजवादी पार्टी हे सगळ्यांचा विचार करणारे सरकार आहे मोबलिंचींग अन्याय विरूध्द आम्ही लढा देणार आहोत लोकसभेत बिल सादर केल्यावर आम्ही विरोध केला मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बिल आणले जाते आहे जमीन खरेदी पार्टी म्हणून भाजपाची ओळख आहे असे यादव म्हणाले यावेळी विजांचा कडकडाट सुरू असताना यादव म्हणाले की आमच्या आवाजात ढगांचे आवजही सोबत आहे मालेगाव मधून समाज वादी पार्टी निवडणूक लढवणार आहे मालेगावचे लोक पावसाप्रमाने आम्हाला भरभरून मते देतील आणि भाजपला विरोध करतील बुलडोझर, एन्काऊंटर च्या विरोधात उत्तर प्रदेशची जनता आहे
खोटे नरेटीव्ह पसरवण्याचे काम भाजप करते आहे यांना धडा शिकवला पाहिजे यासाठी आपण इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराना मतदान करा असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले.

 

शान ए हिंद यांना मालेगावातून उमेदवारी जाहीर


मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी उतरणार आहे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने समाजवादी पक्षातर्फे शान ए हिंद निहाल अहमद यांना उमेदवारी जाहिर करत असुन संपूर्ण मालेगाव मधील जनतेने त्यांना भरगोस मते देऊन निवडून आणावे असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले तर याचवेळी त्यांनी रईस शेख यांना भिवंडीतून उमेदवारी जाहिर करत असल्याचे देखील सांगितले.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago