हिम्मत असेल तर ईव्हीएम हटवा आणि
मतदान घेऊन दाखवा
नाशिकच्या सभेत ठाकरेंचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
अब की बार चारशे पार घोषणा भाजपावाले देत आहेत. पण त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावे, असे थेट आव्हानच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले.
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. केवळ धर्माच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. मतदानासाठी देवांचा आधार घ्यावा लागत आहे. कारण भाजपाकडे कर्तृत्व काहीच नाही सांगण्यासारखे., असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा म्हणजे भेकड पार्टी अशी निर्भत्सनाही त्यांनी केली. छत्रपती शिवरायांनी सूरतेची लूट केली. पण ती इंग्रजाची वखार होती. आज महाराष्ट्राची लूट होत असताना आमचे गद्दार शेपूट घालून बसले आहेत. असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला. महाराष्ट्रातील उद्योग पळविले जात आहेत. महाराष्ट्रासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात हे मोदींनी बंद करावे. यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितेचाही ठाकरेंनी दाखला देत क्रांतीची मशाल पेटविण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही
सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…