हिम्मत असेल तर ईव्हीएम हटवा आणि
मतदान घेऊन दाखवा
नाशिकच्या सभेत ठाकरेंचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
अब की बार चारशे पार घोषणा भाजपावाले देत आहेत. पण त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावे, असे थेट आव्हानच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले.
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. केवळ धर्माच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. मतदानासाठी देवांचा आधार घ्यावा लागत आहे. कारण भाजपाकडे कर्तृत्व काहीच नाही सांगण्यासारखे., असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा म्हणजे भेकड पार्टी अशी निर्भत्सनाही त्यांनी केली. छत्रपती शिवरायांनी सूरतेची लूट केली. पण ती इंग्रजाची वखार होती. आज महाराष्ट्राची लूट होत असताना आमचे गद्दार शेपूट घालून बसले आहेत. असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला. महाराष्ट्रातील उद्योग पळविले जात आहेत. महाराष्ट्रासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात हे मोदींनी बंद करावे. यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितेचाही ठाकरेंनी दाखला देत क्रांतीची मशाल पेटविण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही
सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…