मनमाड जवळ बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी

मनमाड : आमिन शेख

मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील रामदास सिताराम आहेर या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असुन या घटनेमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये  आता धास्ती निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील शेतकरी रामदास सिताराम आहेर हे रात्री 9 वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटोपून घरी येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या वर हल्ला चढविला आणि यात त्यांच्या शरीराचे लचके तौडून त्यांना गंभीर जखमी केले बिबट्याने त्यानंतर धूम ठोकली आहे मात्र आता या भागात बिबटया मुक्त संचार करत असुन आता तो नरभक्षक झाला असल्याने या भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

8 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

9 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

9 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

9 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

9 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

10 hours ago