ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान…!
मनमाड: आमिन शेख
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आधीच शेतीमालाला भाव नाही यामुळे संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात सापडला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल घेऊन नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी केली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता पुनः एकदा अतिवृष्टीचा फटका बसला असुन गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात होत असलेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असुन आधीच भाव नसलेला शेतीमाल व आता कांदा व द्राक्ष पिकांचे होत झालेले नुकसान यामुळे शेतकरी मोठया अडचणींत सापडला असुन ज्या भागात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या भागातील तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून बळीराजा पुन्हा उभा राहील अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक कॉ विजय दराडे यांनी केली आहे भविष्यात शेतीमालाला हमीभाव मिळावा याशिवाय शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत देखील दराडे यांनी व्यक्त केले असुन जर बळीराजाला आर्थिक मदत केली नाही तर राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दराडे यांनी दिला आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…