ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान…!

मनमाड: आमिन शेख

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आधीच शेतीमालाला भाव नाही यामुळे संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात सापडला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल घेऊन नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी केली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता पुनः एकदा अतिवृष्टीचा फटका बसला असुन गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात होत असलेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असुन आधीच भाव नसलेला शेतीमाल व आता कांदा व द्राक्ष पिकांचे होत झालेले नुकसान यामुळे शेतकरी मोठया अडचणींत सापडला असुन ज्या भागात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या भागातील तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून बळीराजा पुन्हा उभा राहील अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक कॉ विजय दराडे यांनी केली आहे भविष्यात शेतीमालाला हमीभाव मिळावा याशिवाय शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत देखील दराडे यांनी व्यक्त केले असुन जर बळीराजाला आर्थिक मदत केली नाही तर राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दराडे यांनी दिला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

गोवंश वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिकरोडला कारवाई नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या…

2 hours ago

साप्ताहिक राशीभविष्य

मेष : गुंतवणूक लाभदायी या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू…

2 hours ago

चोरी करणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या इराद्याने प्रवास; निफाड बसस्थानकात कारवाई निफाड ः विशेष प्रतिनिधी येवला ते नाशिक बसमधून पाच…

3 hours ago

येवला तालुक्यात वादळासह पावसाचा तडाखा

नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले येवला/नगरसूल : प्रतिनिधी येवला तालुक्यात शनिवारी…

3 hours ago

लाडक्या बहिणींचा शिक्षणमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना…

3 hours ago

संत निवृत्तिनाथ पालखीचे उद्या प्रस्थान

नाशिक : प्रतिनिधी आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी…

3 hours ago