मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात;

राहूड घाट बनला अपघातांचा स्पॉट: मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; वाहतूक वळवली
चांदवड,: वार्ताहर

– मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथील राहूड घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री येथे एक भीषण अपघात झाला. एका ट्रकने कट मारल्याने भारत गॅसचा बुलेट टँकर पलटी झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आहे. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
या अपघातात एका टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा आणि एका कंटेनरचाही समावेश होता. अपघात इतका भीषण होता की गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. यामुळे संपूर्ण परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती नाही. मात्र, अपघातात जखमी झालेल्या टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, पण त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अपघाताचं कारण ठरलं रस्त्यावर पडलेलं पोकलेन
या भीषण अपघाताला मुख्य कारण ठरलं याच ठिकाणी रविवारी तुटून पडलेलं एक पोकलेन मशीन. महामार्ग प्राधिकरण किंवा टोलनाका प्रशासनाने ते मशीन वेळेत बाजूला न केल्यामुळे सोमवारी रात्री हा दुसरा अपघात घडला, असं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या घाटात अपघातांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे महामार्ग प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
वाहतुकीत मोठा बदल
गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. नाशिक-धुळे महामार्गावरील वाहतूक चांदवडजवळ बंद करण्यात आली असून, पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
* नाशिककडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक आता चांदवड-मनमाडमार्गे मालेगाव-धुळे अशी वळवण्यात आली आहे.
* धुळ्याकडून नाशिककडे येणारी वाहतूक मालेगाव-देवळा-सोग्रस फाटा-नाशिक अशी वळवण्यात आली आहे.
बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलीस, अग्निशमन दल आणि सोमा टोलवेज कंपनीचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस गळती थांबवण्यासाठी मनमाड आणि सिन्नरमधून विशेष पथके बोलावण्यात आली आहेत. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे भरण्याचं काम सुरू आहे. गॅस गळती थांबवण्याचं काम जोखमीचं असल्याने त्याला संपूर्ण दिवस लागू शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago